शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

चला वीज बचत करू या!

By admin | Updated: September 10, 2014 00:50 IST

मंगळवारची पौर्णिमेची रात्र. महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी रात्री ८ वाजता व्हेरायटी चौकात जमले. या परिसरातील पथदिवे तासभर बंद करून ऊर्जाबचतीचा संकल्प केला. रस्त्याने जाणारे नागरिकही

पौर्णिमेच्या रात्री एक तास दिवे बंद : नागरिकांचा प्रतिसादनागपूर : मंगळवारची पौर्णिमेची रात्र. महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी रात्री ८ वाजता व्हेरायटी चौकात जमले. या परिसरातील पथदिवे तासभर बंद करून ऊर्जाबचतीचा संकल्प केला. रस्त्याने जाणारे नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले. सभोवतालच्या व्यावसायिकांनीही दुकानातील दिवे बंद करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. महापालिकेतर्फे प्रत्येक पौर्णिमेला राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या भाषणात प्रशंसा केली होती. त्यामुळे नागपूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, नगरसेविका लता घाटे, उपअभियंता अजय मानकर, सलीम इकबाल, श्रीकांत भुजाडे, अनिल कडू आणि कर्मचाऱ्यांनी व्हेरायटी चौक गाठून तेथील व्यापारी आणि आजूबाजूच्या नागरिकांना एक तास विजेचे दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रतिष्ठानातील तसेच घरातील दिवे बंद केले. ऊर्जाबचतीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून, नागपूरात सुरू झालेला प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केला, ही नागपूरसाठी मोठी उपलब्धी असल्याचे महापौर दटके म्हणाले. यावेळी ग्रीन व्हिजिल संघटनेचे डॉ. कविता रतन, कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विश्वजित पाईकराव, संदेश साखरे, राहुल राठोड, नीलेश मुनघाटे, कुमारेश टिकादर, शुभम येरखेडे, शीतल चौधरी, राहुल राठोड, पायल राठोड, अनामिका घोष, विष्णुदेव यादव यांनीही या उपक्रमासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. ग्रीन व्हिजिलच्या तरुणांनी परिसरात फिरून नागरिकांना दिवे बंद करण्याचे आवाहन केले. रात्री ९ वाजेपर्यंत व्हेरायटी चौक आणि परिसरातील दिवे बंद ठेवण्यात आले होते. (प्र्रतिनिधी)माहितीपत्रकांचे वितरण वीजनिमिर्तीसाठी ५०० ग्रॅम कोळसा, ७.५ लिटर पाणी खर्च होऊन तापमानात वाढ करणाऱ्या १ हजार ग्रॅम कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन होते. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री एक तास विजेचे दिवे, उपकरणे बंद ठेवून पर्यावरणास हातभार लावण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. वीज वाचवा, पृथ्वी वाचवा तसेच पौर्णिमा दिवस साजरा करा, असा संदेश देणाऱ्या माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.