शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एचए कंपनीला नवसंजीवनी देणार

By admin | Updated: January 8, 2015 01:03 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.

पिंपरी : आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. या कंपनीला निश्चितपणे नवसंजीवनी दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पिंपरी येथे दिली. केंद्रिय केंद्रिय रसायन व खत राज्यमंत्री अहीर यांनी रसायन मंत्रालयाचे सहसचिव अजिज अहमद यांच्याबरोबर बुधवारी पिंपरीतील एच. ए. कंपनीला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. कपंनीचे अधिकारी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार गौतम चाबूकस्वार,भाजपचे शहरध्यक्ष सदाशिव खाडे, भारतीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब धुमाळ, एच. ए. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. वर्की, वित्त संचालक अनिल वैद्य, व्यवस्थापक टी दास, कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर आदि उपस्थित होते.अहिर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय उद्योगधंद्यांना चालना देण्याची भूमिका आहे. देशात स्किल इंडियासारखे विकासाचे प्रकल्प हाती घेतले जात असताना, ज्या कंपनीत काम मिळाले पाहिजे, त्या कंपनीत कौशल्य आत्मसात केलेल्या कामगारांना स्वेच्छा निवृतीव्दारे कमी करणे उचित ठरणारे नाही. एच ए तील कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यांचे थकित वेतन मिळाले पाहिजे,केवळ पुनर्वसन पॅकेज देऊन कंपनीला सावरण्यापेक्षा पुन्हा पुनर्वसन पॅकेज देण्याची वेळ येऊनये, यादृष्टीने कंपनीला पुनरूज्जीवन दिले जाईल. (प्रतिनिधी)बायोफर्टिलायझर उत्पादनांचा विचार ४अन्य राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात वीज महाग आहे. स्वस्तात वीज आणि कच्चा माल उपलब्ध व्हावा, असे धोरण अवंलबण्याचे विचाराधिन आहे. तसेच बायोफर्टिलायझर यासारख्या पर्यायी उत्पादनांचाही विचार केला जाणार आहे. कंपनीच्या मालकीची काही जागा विक्री करून तसेच कर्ज स्वरूपात रक्कम उभी करून कामगारांची थकित देणी तसेच खेळत्या भांडवलासाठी सहाशे कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास ही कंपनी पुन्हा सुरू होईल. खासगी लोकसहभागातून अथवा अन्य मार्गाने सोईस्कर ठरेल, तो पर्याय स्वीकारून कंपनीला नवसंजीवनी दिली जाणार आहे. ४अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत चर्चा करून येत्या दहा दिवसात कंपनीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. चीनच्या औषध उत्पादनांचा भारतीय बाजारपेठेत शिरकाव झाल्याने, कंपनीच्या उत्पादनांना फटका बसला आहे. हे एक कारण तसेच अन्य कारणेही त्यास जबाबदार आहेत. परंतू आता त्याबाबत विचार करण्यापेक्षा कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणते पर्याय उपयुक्त ठरतील. याचा विचार करावा लागणार आहे.