शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

एचए कंपनीला नवसंजीवनी देणार

By admin | Updated: January 8, 2015 01:03 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.

पिंपरी : आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरीतील एच. ए. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. या कंपनीला निश्चितपणे नवसंजीवनी दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पिंपरी येथे दिली. केंद्रिय केंद्रिय रसायन व खत राज्यमंत्री अहीर यांनी रसायन मंत्रालयाचे सहसचिव अजिज अहमद यांच्याबरोबर बुधवारी पिंपरीतील एच. ए. कंपनीला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. कपंनीचे अधिकारी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार गौतम चाबूकस्वार,भाजपचे शहरध्यक्ष सदाशिव खाडे, भारतीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब धुमाळ, एच. ए. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. वर्की, वित्त संचालक अनिल वैद्य, व्यवस्थापक टी दास, कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर आदि उपस्थित होते.अहिर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय उद्योगधंद्यांना चालना देण्याची भूमिका आहे. देशात स्किल इंडियासारखे विकासाचे प्रकल्प हाती घेतले जात असताना, ज्या कंपनीत काम मिळाले पाहिजे, त्या कंपनीत कौशल्य आत्मसात केलेल्या कामगारांना स्वेच्छा निवृतीव्दारे कमी करणे उचित ठरणारे नाही. एच ए तील कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यांचे थकित वेतन मिळाले पाहिजे,केवळ पुनर्वसन पॅकेज देऊन कंपनीला सावरण्यापेक्षा पुन्हा पुनर्वसन पॅकेज देण्याची वेळ येऊनये, यादृष्टीने कंपनीला पुनरूज्जीवन दिले जाईल. (प्रतिनिधी)बायोफर्टिलायझर उत्पादनांचा विचार ४अन्य राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात वीज महाग आहे. स्वस्तात वीज आणि कच्चा माल उपलब्ध व्हावा, असे धोरण अवंलबण्याचे विचाराधिन आहे. तसेच बायोफर्टिलायझर यासारख्या पर्यायी उत्पादनांचाही विचार केला जाणार आहे. कंपनीच्या मालकीची काही जागा विक्री करून तसेच कर्ज स्वरूपात रक्कम उभी करून कामगारांची थकित देणी तसेच खेळत्या भांडवलासाठी सहाशे कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास ही कंपनी पुन्हा सुरू होईल. खासगी लोकसहभागातून अथवा अन्य मार्गाने सोईस्कर ठरेल, तो पर्याय स्वीकारून कंपनीला नवसंजीवनी दिली जाणार आहे. ४अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत चर्चा करून येत्या दहा दिवसात कंपनीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. चीनच्या औषध उत्पादनांचा भारतीय बाजारपेठेत शिरकाव झाल्याने, कंपनीच्या उत्पादनांना फटका बसला आहे. हे एक कारण तसेच अन्य कारणेही त्यास जबाबदार आहेत. परंतू आता त्याबाबत विचार करण्यापेक्षा कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणते पर्याय उपयुक्त ठरतील. याचा विचार करावा लागणार आहे.