शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

...तर भाजपाचे समर्थन काढून घेऊ!

By admin | Updated: April 20, 2016 05:43 IST

कसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मुस्लीम संघाने नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यांत सरकारने अजेंड्यावरील मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सरकारला दिलेले समर्थन काढून घेऊ, असा इशारा संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत एकदाही भेटीसाठी वेळ दिला नसल्याची नाराजी संघाचे मुख्य संयोजक फकीर मोहम्मद ठाकूर यांनी व्यक्त केली. ठाकूर म्हणाले, ‘निवडणुकांआधी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या मध्यस्थीनंतर मुस्लीम समाजासाठी काम करणाऱ्या १५०हून अधिक संस्था आणि संघटनांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मुस्लीम समाजाच्या अनेक प्रश्नांसह मेहमुदूर रेहमान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र, त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप सरकारने केलेली नाही. संघाचे ३२ जिल्ह्यांतील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक झाली. त्यात प्रत्येक सदस्याने मनातील खदखद व्यक्त केली. अल्पसंख्यांक समाजासाठी सरकारने सुरू केलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी ताशेरे ओढले. उच्चशिक्षण घेणाऱ्या शेकडो मुस्लीम तरुण विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने, परीक्षेला मुकावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. दुष्काळग्रस्तांसाठी पुढाकारराज्यातील मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळग्रस्त गावांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लीम संघ निधी गोळा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी मुस्लीम समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना आवाहन केले जाईल. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी संघ एक गाव दत्तक घेणार असून, सध्या तात्पुरत्या स्वरूपात अधिकाधिक दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)