शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अहवालानंतर भूमिका स्पष्ट करू

By admin | Updated: December 29, 2014 05:14 IST

राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे

ठाणे : राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. हे होत असतानाच टोलच्या माध्यमातून जनतेवरही त्याचा ताण येणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्रीही यावर गंभीर आहेत. जोशी समितीच्या अहवालानंतरच टोलविषयक धोरणाची सरकारकडून भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.राज्यातील टोलबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने ४४ टोल नाके बंद केले होते. यासंदर्भात नागपूर, चंद्रपूर मार्गावरील तडाली टोल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला स्थगिती दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिंदे म्हणाले, आधी जे ४४ टोल बंद झाले आहेत, त्या सर्व टोलचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. विकास होण्यासाठी रस्ते मोठे होणे आवश्यक आहेच. वाहतूककोंडी दूर झाली पाहिजे. दळणवळण सक्षम झाले पाहिजे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पही राबविले गेले पाहिजेत. परंतु, टोलच्या माध्यमातून जनतेवर जर त्याचा ताण पडणार असेल तर त्यासाठीच्या अनेक पर्यायांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. मुळात आधीपासून सुरू असलेल्या या टोलमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी सी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या दोन महिन्यांत निर्णय देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या मुद्यावर गंभीर असल्यामुळे जोशी यांच्यासह मंत्रालयीन पातळीवर एकत्रित विचारविनिमय करून त्याबाबत शासन आपला निर्णय देणार आहे. त्यानंतरच सरकार यावरील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)