शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

अहवालानंतर भूमिका स्पष्ट करू

By admin | Updated: December 29, 2014 05:14 IST

राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे

ठाणे : राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. हे होत असतानाच टोलच्या माध्यमातून जनतेवरही त्याचा ताण येणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्रीही यावर गंभीर आहेत. जोशी समितीच्या अहवालानंतरच टोलविषयक धोरणाची सरकारकडून भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.राज्यातील टोलबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने ४४ टोल नाके बंद केले होते. यासंदर्भात नागपूर, चंद्रपूर मार्गावरील तडाली टोल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला स्थगिती दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिंदे म्हणाले, आधी जे ४४ टोल बंद झाले आहेत, त्या सर्व टोलचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. विकास होण्यासाठी रस्ते मोठे होणे आवश्यक आहेच. वाहतूककोंडी दूर झाली पाहिजे. दळणवळण सक्षम झाले पाहिजे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पही राबविले गेले पाहिजेत. परंतु, टोलच्या माध्यमातून जनतेवर जर त्याचा ताण पडणार असेल तर त्यासाठीच्या अनेक पर्यायांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. मुळात आधीपासून सुरू असलेल्या या टोलमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी सी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या दोन महिन्यांत निर्णय देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या मुद्यावर गंभीर असल्यामुळे जोशी यांच्यासह मंत्रालयीन पातळीवर एकत्रित विचारविनिमय करून त्याबाबत शासन आपला निर्णय देणार आहे. त्यानंतरच सरकार यावरील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)