शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

अहवालानंतर भूमिका स्पष्ट करू

By admin | Updated: December 29, 2014 05:14 IST

राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे

ठाणे : राज्याचा विकास करण्यासाठी दळणवळणातील सुधारणा गरजेच्या आहेत. उड्डाणपुलासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. हे होत असतानाच टोलच्या माध्यमातून जनतेवरही त्याचा ताण येणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्रीही यावर गंभीर आहेत. जोशी समितीच्या अहवालानंतरच टोलविषयक धोरणाची सरकारकडून भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.राज्यातील टोलबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने ४४ टोल नाके बंद केले होते. यासंदर्भात नागपूर, चंद्रपूर मार्गावरील तडाली टोल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला स्थगिती दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिंदे म्हणाले, आधी जे ४४ टोल बंद झाले आहेत, त्या सर्व टोलचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. विकास होण्यासाठी रस्ते मोठे होणे आवश्यक आहेच. वाहतूककोंडी दूर झाली पाहिजे. दळणवळण सक्षम झाले पाहिजे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पही राबविले गेले पाहिजेत. परंतु, टोलच्या माध्यमातून जनतेवर जर त्याचा ताण पडणार असेल तर त्यासाठीच्या अनेक पर्यायांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. मुळात आधीपासून सुरू असलेल्या या टोलमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी सी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या दोन महिन्यांत निर्णय देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या मुद्यावर गंभीर असल्यामुळे जोशी यांच्यासह मंत्रालयीन पातळीवर एकत्रित विचारविनिमय करून त्याबाबत शासन आपला निर्णय देणार आहे. त्यानंतरच सरकार यावरील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)