शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेचा विचार करू

By admin | Updated: January 29, 2015 05:32 IST

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, मात्र त्या दृष्टीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेचा नक्की विचार करणार

ठाणे : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, मात्र त्या दृष्टीने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेचा नक्की विचार करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यंदापासून दहावी आणि बारावीची प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी देण्याबाबत सूचना केल्या असून, पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या घराजवळ परीक्षेचे सेंटर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. ते ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०१५’चा समारोप समारंभ ठाणे पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानात घेण्यात आला. या वेळी वाहतुकीसंदर्भात घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील ३०० चित्रांच्या कॉफीटेबल बुकचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते रजा मुराद, अभिनेत्री तनुश्री दत्ता, अभिनेते आदेश बांदेकर, परवीन दुबार, पोलीस आयुक्त विजय कांबळे, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या टॅबटेबल योजनेबरोबरच अन्य गोष्टींचा विचार करून एक योग्य योजना अमलात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या पूर्वतयारीचा आढावा घेत परीक्षेसाठी ४ वेळा घंटा वाजवण्यात याव्यात, अशा सूचना केल्याने विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी वर्गात बसवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)