शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

By admin | Updated: July 22, 2014 02:10 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी कडक भूमिका घेतली असून, पक्ष कोणत्याही दबावापुढे नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे असले ते जाऊ शकतात, असे पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे. 
याशिवाय आसाम, हरियाणा आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला, असे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. यासंदर्भात पक्षाची भूमिका प्रवक्ते  अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. लोक असंतुष्ट आहेत, तर राहू देत. एकेक राज्यातून एकेक नेता जात आहे. त्या राज्यातील जनता सर्व बघत आहे, असे सिंघवी म्हणाले. नारायण राणो यांना मुख्यमंत्री बनायचे होते. अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद दिले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
ज्यांना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर आक्षेप आहे, त्यांनी पक्ष सोडावा, असेही ते म्हणाले. त्यांनी राणो यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचे संकेत राणो यांच्या दिशेने होते. केवळ महाराष्ट्रात नव्हेतर आसाम, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगालमध्ये देखील पक्षात बंडाचे वृत्त आहे. 
आसाममध्ये 32 आमदारांसह हिमांत बिस्वा सर्मा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडवले आहे. सर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोबतच त्यांनी बंडात कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शविली आहे. 
दुसरीकडे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील कडक भूमिका घेतली आहे. सर्मा यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनवण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आसामध्ये असंतुष्ट आणि पक्षश्रेष्ठींमध्ये आरपारची लढाई 
सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये माजी खासदार लालसिंग यांनी बंडखोरी केली. 
तर नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आली. हरियाणामध्ये खासदार चौधरी वीरेंद्रसिंग यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात बंड करून 
पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. 
पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे तीन 
आमदार फटून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तरीदेखील काँग्रेस पक्षश्रेष्ठी नमते घेण्यास तयार नाही. 
 
महाराष्ट्र, हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक जिंकणो कठीण आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लांब आहे. तर मग असंतुष्टांसमोर नमते काघ्यावे, काँग्रेस नेतृत्वाला वाटते आहे, असे सूत्रंनी सांगितले. महाराष्ट्राबाबत  रविवारी रात्री सोनिया गांधी यांनी राज्यातील मोठय़ा नेत्यांशी चर्चा केली होती आणि स्पष्ट केले की, पक्ष कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही.