शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

By admin | Updated: July 22, 2014 02:10 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी कडक भूमिका घेतली असून, पक्ष कोणत्याही दबावापुढे नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे असले ते जाऊ शकतात, असे पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे. 
याशिवाय आसाम, हरियाणा आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला, असे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. यासंदर्भात पक्षाची भूमिका प्रवक्ते  अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. लोक असंतुष्ट आहेत, तर राहू देत. एकेक राज्यातून एकेक नेता जात आहे. त्या राज्यातील जनता सर्व बघत आहे, असे सिंघवी म्हणाले. नारायण राणो यांना मुख्यमंत्री बनायचे होते. अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद दिले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
ज्यांना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर आक्षेप आहे, त्यांनी पक्ष सोडावा, असेही ते म्हणाले. त्यांनी राणो यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचे संकेत राणो यांच्या दिशेने होते. केवळ महाराष्ट्रात नव्हेतर आसाम, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगालमध्ये देखील पक्षात बंडाचे वृत्त आहे. 
आसाममध्ये 32 आमदारांसह हिमांत बिस्वा सर्मा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडवले आहे. सर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोबतच त्यांनी बंडात कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शविली आहे. 
दुसरीकडे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील कडक भूमिका घेतली आहे. सर्मा यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनवण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आसामध्ये असंतुष्ट आणि पक्षश्रेष्ठींमध्ये आरपारची लढाई 
सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये माजी खासदार लालसिंग यांनी बंडखोरी केली. 
तर नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आली. हरियाणामध्ये खासदार चौधरी वीरेंद्रसिंग यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात बंड करून 
पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. 
पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे तीन 
आमदार फटून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तरीदेखील काँग्रेस पक्षश्रेष्ठी नमते घेण्यास तयार नाही. 
 
महाराष्ट्र, हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक जिंकणो कठीण आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लांब आहे. तर मग असंतुष्टांसमोर नमते काघ्यावे, काँग्रेस नेतृत्वाला वाटते आहे, असे सूत्रंनी सांगितले. महाराष्ट्राबाबत  रविवारी रात्री सोनिया गांधी यांनी राज्यातील मोठय़ा नेत्यांशी चर्चा केली होती आणि स्पष्ट केले की, पक्ष कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही.