शहरं
Join us  
Trending Stories
1
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
2
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
3
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
4
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
5
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
6
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
7
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
8
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
9
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
10
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
15
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
16
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
17
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
18
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
19
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
20
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

होऊन जाऊ दे, हलकल्लोळ !

By admin | Updated: August 1, 2015 00:33 IST

-कारण राजकारण

एका नेत्याच्या (म्हणजे इस्लामपूरकरांच्या) अतिमहत्त्वाकांक्षेनं जिल्ह्याच्या राजकारणाची वाट लागल्याचा घणाघात सोनसळकर साहेबांनी या आठवड्यात केला. अर्थात याला घणाघात म्हणायचं की, घंटीची किणकिण, हे जिल्ह्यानं ठरवावं! कारण अलीकडं सोनसळकर आणि इस्लामपूरकर या दोन्ही साहेबांमध्ये खरंच फाटलंय का, असा खवचट सवाल ऐकायला येतोय. एवढे दिवस हातात-हात (कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं) घालून फिरणाऱ्या या दोघांना पुरेपूर ओळखणाऱ्यांच्या डोक्यात असा संशयाचा किडा वळवळणारच. या गंडवा-गंडवीचा पुरेपूर प्रत्यय प्रतीकदादांनी घेतलाय. आता जिल्हा बँकेपाठोपाठ बाजार समितीत मदनभाऊ आणि विशालदादा घेताहेत, अशी कुजबूज सुरू झालीय. कोणे एके काळी या दोघा साहेबांना मुख्यमंत्रीपदाची आस होती. ती लपून राहिलेली नव्हती. त्यात सोनसळकरांची जरा जास्त चर्चा झाली. आता सरकार गेल्यानं दोघांनी ‘आधी जिल्ह्याचं बघू’, म्हणून इथं लक्ष घातलंय. (तसं दोघांनाही आता काही काम राहिलेलं नाही म्हणा!) जिल्ह्यावर ‘कमांड’ ठेवण्यासाठी आणि वसंतदादा घराणं नेस्तनाबूत करण्यासाठी पंधरा वर्षं धडपडणाऱ्या इस्लामपूरकरांना आता कुठं यश येतंय, असं वाटत असतानाच सोनसळकर आडवे आलेत. सांगलीच्या बाजार समितीत तर शेट्टींचे राजूभाई, प्रतीकदादा, विशालदादा, महाडिक कंपनी, ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ गुऱ्हाळकर (त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपत नसल्यानं त्यांचं आडनाव ‘गुऱ्हाळकर’ ठेवलंय म्हणे!), मिरजेचे हाफिजभाई या नेहमीच्या यशवंत-गुणवंत कलाकारांसोबत आता अजितराव घोरपडे सरकार, सांगलीवाडीचे दिनकरतात्या, कवठेपिरानच्या हिंदकेसरींचे भीमराव आणि ‘जनसुराज्य’चे नारळवाले बसवराजही सोनसळकर साहेबांसोबत एकत्र आलेत. सरकार, तात्या आणि बसवराज कालपरवापर्यंत संजयकाका आणि जगताप साहेबांसोबत होते, पण पदरात काहीच पडेना झाल्यावर त्यांनी काडीमोड घेतला. नारळवाल्या बसवराजांना तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं होतं. मुदत संपल्यावर त्यांनी दुगाण्या झाडल्या!तिकडं इस्लामपूरकर साहेबांनी खासदार संजयकाका आणि जतच्या जगताप साहेबांना हिकमतीनं जवळ ठेवलंय. (दोघं अजून इस्लामपूरकरांच्या ऋणातून मुक्त व्हायचेत ना!) शिवाय आबांचे मावळेही त्यांच्यामागं फरफटत जाताहेत. काही मावळ्यांनी इस्लामपूरकर साहेबांपुढं पांढरं निशाण फडकवलंय, तर काहींनी जाहीरपणे संजयकाकांचं ‘कमळ’ हातात घेतलंय. (काय करणार? राजकीय साठमारीत टिकायचं तर असं ‘शहाणपण’ दाखवायलाच हवं.) सांगली बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी इस्लामपूरकरांची जय्यत तयारी सुरू असली तरी तासगाव बाजार समितीत मात्र त्यांना काकांना अंगावर घ्यायची वेळ आली, पण इस्लामपूरकर कसले हुशार! त्यांनी पुन्हा चतुराईनं आबा-काका गटात झुंज लावून दिलीय. बसा लढत आणि डोकी फोडत! मणेराजुरी जिल्हा परिषद गटातला वचपा काकांनी जिल्हा बँकेत काढला, तो कुणाच्या इशाऱ्यावर? आबांचे मावळे एकमेकांची गचांडी धरू लागले, ते कुणाच्या उद्योगामुळं? हे ज्यांना कळलं, ते एकतर आबांचा गट सोडताहेत किंवा राजकारणाला रामराम तरी ठोकताहेत!काही का असेना, जिल्हाभरात दोन्ही साहेबांची जुंपलीय म्हणायचं. (किमान समजायचं तरी!) मागील वेळी जिल्हा बँकेत एकत्र असल्यानं सोनसळकर साहेबांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी शपथ घेतली होती. त्यामुळं बँकेतल्या अड्डेबाजीवर ते गप्प होते. बँक बरखास्त झाली, प्रशासक आला (तो सोनसळकरांनीच आणला, असं आता इस्लामपूरकर म्हणताहेत.) निवडणूक लागली, तेव्हा इस्लामपूरकरांच्या कंपूनं जिल्हा बँकेला राजकारणाचा अड्डा बनवल्याची तोफ डागून सोनसळकरांनी रान पेटवलं होतं. ते लक्षात ठेवून इस्लामपूरकरांनी आता बाजार समितीला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नसल्याचं आधीच सांगून टाकलं! वा रे पठ्ठे! त्यावर मदनभाऊंकडून हिसकावून घेतलेल्या बाजार समितीत रात्री कुणाचा अड्डा भरायचा? तिथं काय-काय चालायचं? याची उत्तरं सोनसळकरांनी इस्लामपूरकरांकडं मागितलीत. एवढं सगळं सुरू असताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालासाठी आणि व्यापार टिकवून ठेवण्यासाठी काय करणार, हे कुणीच बोलत नाही. तिथल्या प्रश्नांवर मात्र सगळ्यांचीच अळीमिळी-गुपचिळी!जाता-जाता : ‘त्यांचे इंटरेस्ट वेगळे आणि आमचे वेगळे. माझंच मीठ कसं खोटं निघतं? मी ज्याला हाताला धरून मोठं करतो, तो माझ्यावरच कसा उलटतो?’ असा सवाल घोरपडे सरकारांनी (स्वत:लाच) केला आणि संजयकाकांच्या वर्मी घाव लागला. मग ‘आम्ही तोंड उघडलं तर तुमची अडचण होईल...’ अशा जहाल शब्दात संजयकाकांनी सरकारांना बजावलं. आता काकांनी तोंड उघडावंच! कारण काका-सरकारांचं शीतयुद्ध (लुटुपुटुचं की खरंखुरं?) चव्हाट्यावर आलंय. लोकसभेला निवडून आणल्यानंतरही सगळी मलई (पक्षी : लाभाची पदं) काकांनाच... आणि आम्ही काय नुसत्या टाळ्या वाजवायच्या काय, या प्रश्नातून तर सरकार, दिनकरतात्या आणि काकांचं फाटलं नसेल ना? सरकारांनी तेही सांगून टाकावं आणि काकांनीही तोंड उघडून सरकारांची अंडीपिल्ली बाहेर काढावीत... होऊन जाऊ दे, कमळाबाईच्या तंबूमध्ये हलकल्लोळ! --- श्रीनिवास नागे