शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

होऊन जाऊ दे, हलकल्लोळ !

By admin | Updated: August 1, 2015 00:33 IST

-कारण राजकारण

एका नेत्याच्या (म्हणजे इस्लामपूरकरांच्या) अतिमहत्त्वाकांक्षेनं जिल्ह्याच्या राजकारणाची वाट लागल्याचा घणाघात सोनसळकर साहेबांनी या आठवड्यात केला. अर्थात याला घणाघात म्हणायचं की, घंटीची किणकिण, हे जिल्ह्यानं ठरवावं! कारण अलीकडं सोनसळकर आणि इस्लामपूरकर या दोन्ही साहेबांमध्ये खरंच फाटलंय का, असा खवचट सवाल ऐकायला येतोय. एवढे दिवस हातात-हात (कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं) घालून फिरणाऱ्या या दोघांना पुरेपूर ओळखणाऱ्यांच्या डोक्यात असा संशयाचा किडा वळवळणारच. या गंडवा-गंडवीचा पुरेपूर प्रत्यय प्रतीकदादांनी घेतलाय. आता जिल्हा बँकेपाठोपाठ बाजार समितीत मदनभाऊ आणि विशालदादा घेताहेत, अशी कुजबूज सुरू झालीय. कोणे एके काळी या दोघा साहेबांना मुख्यमंत्रीपदाची आस होती. ती लपून राहिलेली नव्हती. त्यात सोनसळकरांची जरा जास्त चर्चा झाली. आता सरकार गेल्यानं दोघांनी ‘आधी जिल्ह्याचं बघू’, म्हणून इथं लक्ष घातलंय. (तसं दोघांनाही आता काही काम राहिलेलं नाही म्हणा!) जिल्ह्यावर ‘कमांड’ ठेवण्यासाठी आणि वसंतदादा घराणं नेस्तनाबूत करण्यासाठी पंधरा वर्षं धडपडणाऱ्या इस्लामपूरकरांना आता कुठं यश येतंय, असं वाटत असतानाच सोनसळकर आडवे आलेत. सांगलीच्या बाजार समितीत तर शेट्टींचे राजूभाई, प्रतीकदादा, विशालदादा, महाडिक कंपनी, ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ गुऱ्हाळकर (त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपत नसल्यानं त्यांचं आडनाव ‘गुऱ्हाळकर’ ठेवलंय म्हणे!), मिरजेचे हाफिजभाई या नेहमीच्या यशवंत-गुणवंत कलाकारांसोबत आता अजितराव घोरपडे सरकार, सांगलीवाडीचे दिनकरतात्या, कवठेपिरानच्या हिंदकेसरींचे भीमराव आणि ‘जनसुराज्य’चे नारळवाले बसवराजही सोनसळकर साहेबांसोबत एकत्र आलेत. सरकार, तात्या आणि बसवराज कालपरवापर्यंत संजयकाका आणि जगताप साहेबांसोबत होते, पण पदरात काहीच पडेना झाल्यावर त्यांनी काडीमोड घेतला. नारळवाल्या बसवराजांना तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं होतं. मुदत संपल्यावर त्यांनी दुगाण्या झाडल्या!तिकडं इस्लामपूरकर साहेबांनी खासदार संजयकाका आणि जतच्या जगताप साहेबांना हिकमतीनं जवळ ठेवलंय. (दोघं अजून इस्लामपूरकरांच्या ऋणातून मुक्त व्हायचेत ना!) शिवाय आबांचे मावळेही त्यांच्यामागं फरफटत जाताहेत. काही मावळ्यांनी इस्लामपूरकर साहेबांपुढं पांढरं निशाण फडकवलंय, तर काहींनी जाहीरपणे संजयकाकांचं ‘कमळ’ हातात घेतलंय. (काय करणार? राजकीय साठमारीत टिकायचं तर असं ‘शहाणपण’ दाखवायलाच हवं.) सांगली बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी इस्लामपूरकरांची जय्यत तयारी सुरू असली तरी तासगाव बाजार समितीत मात्र त्यांना काकांना अंगावर घ्यायची वेळ आली, पण इस्लामपूरकर कसले हुशार! त्यांनी पुन्हा चतुराईनं आबा-काका गटात झुंज लावून दिलीय. बसा लढत आणि डोकी फोडत! मणेराजुरी जिल्हा परिषद गटातला वचपा काकांनी जिल्हा बँकेत काढला, तो कुणाच्या इशाऱ्यावर? आबांचे मावळे एकमेकांची गचांडी धरू लागले, ते कुणाच्या उद्योगामुळं? हे ज्यांना कळलं, ते एकतर आबांचा गट सोडताहेत किंवा राजकारणाला रामराम तरी ठोकताहेत!काही का असेना, जिल्हाभरात दोन्ही साहेबांची जुंपलीय म्हणायचं. (किमान समजायचं तरी!) मागील वेळी जिल्हा बँकेत एकत्र असल्यानं सोनसळकर साहेबांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी शपथ घेतली होती. त्यामुळं बँकेतल्या अड्डेबाजीवर ते गप्प होते. बँक बरखास्त झाली, प्रशासक आला (तो सोनसळकरांनीच आणला, असं आता इस्लामपूरकर म्हणताहेत.) निवडणूक लागली, तेव्हा इस्लामपूरकरांच्या कंपूनं जिल्हा बँकेला राजकारणाचा अड्डा बनवल्याची तोफ डागून सोनसळकरांनी रान पेटवलं होतं. ते लक्षात ठेवून इस्लामपूरकरांनी आता बाजार समितीला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नसल्याचं आधीच सांगून टाकलं! वा रे पठ्ठे! त्यावर मदनभाऊंकडून हिसकावून घेतलेल्या बाजार समितीत रात्री कुणाचा अड्डा भरायचा? तिथं काय-काय चालायचं? याची उत्तरं सोनसळकरांनी इस्लामपूरकरांकडं मागितलीत. एवढं सगळं सुरू असताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालासाठी आणि व्यापार टिकवून ठेवण्यासाठी काय करणार, हे कुणीच बोलत नाही. तिथल्या प्रश्नांवर मात्र सगळ्यांचीच अळीमिळी-गुपचिळी!जाता-जाता : ‘त्यांचे इंटरेस्ट वेगळे आणि आमचे वेगळे. माझंच मीठ कसं खोटं निघतं? मी ज्याला हाताला धरून मोठं करतो, तो माझ्यावरच कसा उलटतो?’ असा सवाल घोरपडे सरकारांनी (स्वत:लाच) केला आणि संजयकाकांच्या वर्मी घाव लागला. मग ‘आम्ही तोंड उघडलं तर तुमची अडचण होईल...’ अशा जहाल शब्दात संजयकाकांनी सरकारांना बजावलं. आता काकांनी तोंड उघडावंच! कारण काका-सरकारांचं शीतयुद्ध (लुटुपुटुचं की खरंखुरं?) चव्हाट्यावर आलंय. लोकसभेला निवडून आणल्यानंतरही सगळी मलई (पक्षी : लाभाची पदं) काकांनाच... आणि आम्ही काय नुसत्या टाळ्या वाजवायच्या काय, या प्रश्नातून तर सरकार, दिनकरतात्या आणि काकांचं फाटलं नसेल ना? सरकारांनी तेही सांगून टाकावं आणि काकांनीही तोंड उघडून सरकारांची अंडीपिल्ली बाहेर काढावीत... होऊन जाऊ दे, कमळाबाईच्या तंबूमध्ये हलकल्लोळ! --- श्रीनिवास नागे