शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकांना जुन्या नोटा स्वीकारु द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 04:35 IST

जिल्हा मध्यवर्ती बँका आणि पतसंस्थांमध्ये जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी व तिथे शेतक-यांकडून जुन्या

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँका आणि पतसंस्थांमध्ये जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी व तिथे शेतक-यांकडून जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी मंत्रीमंडळ उपसमितीने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. काल सायंकाळी या समितीची बैठक मंत्रालयात झाली आणि त्यानंतर वित्त मंत्र्यांनी रात्री रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हा बँकांवर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे वर्चस्व असते. त्यामुळे या बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा होऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापि, या बँकांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पैसा आहे. नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती द्यावी, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी) बँकांना रोज १० लाखांचा तोटा राज्यातील जिल्हा बँकांना दररोज १० लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. खातेदाराला केवळ पैसे काढता येण्याची परवानगी आहे. परंतु, त्यासाठीही चेस्ट करन्सी बँकेतून पुरवठा होत नसल्याने सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार थंडावले आहेत, असे या राज्यातील अकरा जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान भरणा झालेल्या रद्द नोटांचा साठा मोठ्या प्रमाणात पडून आहे. या बँकांच्या करन्सी चेस्ट असणाऱ्या आयडीबीआय, बँक आॅफ इंडीया आणि सेंट्रल बँक या बँका हा भरणा स्विकारत नाहीत.त्यामुळे जिल्हा बँकांचा पैसे राखून ठेवण्याचे प्रमाण (सीआरआररेशो) मर्यादेपेक्षा अधिक झाले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. सध्या कर्ज वसुली हंगाम सुरु असून ५०० व १००० च्या नोटा स्विकारण्यास परवानगी मिळत नसल्याने बँकांच्या कर्ज वसुलीवर विपरित परिणाम झाला आहे. बहुतेक कर्ज खाती बुडीत खात्यामध्ये (एन.पी.ए.) मध्ये जाण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांसाठी मजुरी, खत, औषधे यांच्यावर खर्च करणे जिकीरीचे झाले आहे,असे निवेदनात म्हटले आहे. ाुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, अकोला, सांगली, लातूर, बुलडाणा, परभणी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी हे निवेदन सहकार आयुक्तांना दिले. आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास मोफत बनावट नोटांसह पेट्रोलपंप चालकांना लोकांची दूषणेही खावी लागत आहे. मुळात जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देणाऱ्या शासनाने, पेट्रोलपंप चालकांना कोणत्याही प्रकारचे सुटे पैसे पुरवलेले नाहीत. मात्र, दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेसह पाचशे आणि हजार रुपयांचे जुन्या नोटा घेऊन येणाऱ्या चालकांना देण्यासाठी पुरेसे सुटे पैसे नसल्याचे पंपचालक सांगतात. त्यामुळे वाहन चालकांसोबत वादावादी होत असून, प्रसंगी शिव्या खाव्या लागत असल्याचे फामपेडाचे म्हणणे आहे.

जेटलींना भेटणार-राज्यतील जिल्हा बँकांना चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी जिल्हा बँकेच्या संचालकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेटणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आणि रायगड जिल्हा बँकेचे संचालक जयंत पाटील यांनी दिली. जिल्हा बँकांवर घातलेल्या निर्बंधांबाबत मुंबई येथे जिल्हा बँकांच्या संचालकांची बैठक झाली. राज्यातील ३१ जिल्हा बँकांपैकी बहुतांश बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या मनाई आदेशानंतर पुढील कारवाईसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठक सुरु असतानाच आ. प्रवीण दरेकर आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आपण सकारात्मक असून शिष्टमंडळासह केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.