शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्या सर्व नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

By admin | Updated: July 20, 2016 06:13 IST

कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले आहे

मुंबई : कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले असून, या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच, या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.कोपर्डीच्या घटनेवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज वादळी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत, अवैध दारूवाल्यांना आळा घालण्याची जोरदार मागणी केली. चर्चेला उत्तर देताना, अवैध दारू तयार करणे आणि विक्रीच्या गुन्ह्यात सध्या तीन वर्षांची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा दहा वर्षांची करण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुटुंबातील महिला आणि गावातील, तसेच परिसरातील महिलांच्या भावना समजून घेण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला त्या ठिकाणी जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारच्या वतीने अ‍ॅड.ऊज्ज्वल निकम बाजू मांडतील. घटनेचे साक्षीदार नसले तरी डीएनएचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी ते जलदगती न्यायालयाकडे सोपविण्यात आले असून त्याची सुनावणी नियमित घ्यावी. तिला स्थगिती देऊ नये अशी विनंती उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयाला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.कोपर्डीच्या घटनेत आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी एका शिंदे नामक व्यक्तीचाही सहभाग असून त्याचा संबंध पूर्वी एका कथित खून प्रकरणाशी असल्याचेही म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चवथ्या व्यक्तीविरुद्धही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षकांनी लगेचच भेट दिली. त्याचबरोबर पालकमंत्री राम शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही भेट दिली.मी आधी रशियाचा दौरा, नंतर आषाढीनिमित्त पंढरपूर, लगेच मुख्यमंत्री परिषदेसाठी दिल्लीला गेल्याने जाऊ शकलो नाही तरीही तेथील प्रत्येक बाबीची जातीने माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोपर्डीतील घटनेच्या निमित्ताने जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व समाजघटकांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)>आरोपपत्र तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या प्रमुख पाच डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून, डीएनए अहवालासह न्यायवैद्यक पुरावे पुढील पाचसहा दिवसांत गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आधारे आरोपपत्र तातडीने दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.