शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

‘पीएचडी’ नोंदणीअगोदर संशोधन पद्धतीचे धडे ?

By admin | Updated: January 9, 2017 20:21 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी व्हावी यादृष्टीने विविध पावले उचलण्यात आली आहेत.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी व्हावी यादृष्टीने विविध पावले उचलण्यात आली आहेत. पुढील वर्षीपासून नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसमोरील आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे.‘पीएचडी’ नोंदणीअगोदर संशोधनपद्धती कार्यशाळा करणे अनिवार्य करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाचा विचार सुरू आहे. असे झाले तर नोंदणीअगोदरच संशोधनपद्धतीची रुपरेषा उमेदवारांसमोर स्पष्ट होण्यास बरीच मदत मिळेल.
देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘युजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती. नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. त्यामुळे यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील मागील वर्षी नवीन नियमावली जारी केली होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुण अनिवार्य करण्यात आले होते. शिवाय नोंदणीसाठी ‘पेट’च्या २ परीक्षा उत्तीर्ण करण्याची अटदेखील लागू करण्यात आली.
नियमावली कडक केल्यामुळे फारशी तयार न करता नोंदणीसाठी सामोरे गेलेल्या उमेदवारांना फटका बसला आहे. ‘आरआरसी’साठी (रिसर्च अ‍ॅन्ड रिकग्निशन कमिटी) पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी केवळ ३२ टक्के उमेदवारांचीच नोंदणी होऊ शकली.
‘पीएचडी’साठी नियमांनुसार संशोधन पद्धतीवर ‘कोर्सवर्क’ आवश्यक असते. यासंदर्भात संशोधन पद्धतीच्या कार्यशाळा घेण्यात येतात. या ‘कोर्सवर्क’चा ६० तासांचा अभ्यासक्रम विद्यापीठाकडून तयारदेखील करण्यात आला आहे. याची उमेदवारांना ‘आॅ़नलाईन’ परीक्षादेखील द्यावी लागले. मात्र आता नोंदणीअगोदरच ही कार्यशाळा करणे व त्यात उत्तीर्ण होण्याची अट लागू होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने प्रशासनाचा विचार सुरू आहे. 
विद्यापीठातील ‘पीएचडी’ची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही अगोदरच नियम कडक केले आहेत. ‘युजीसी’च्या नवीन नियमावलीचे आम्ही पालन करत असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. ‘पीएचडी’ करण्याअगोदर जर विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीचे विस्तृत ज्ञान असले तर ते त्यांच्या फायद्याचे ठरु शकते. शिवाय यामुळे दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी होऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षीपासून नोंदणीअगोदर ‘कोर्सवर्क’ करणे अनिवार्य करण्यासंदर्भात आमचा विचार सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.