शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज पुनर्गठणाकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 13, 2016 23:28 IST

हणमंत गायकवाड ल्ल लातूर शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये

हणमंत गायकवाड ल्ल लातूरशेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यापैकी १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी ५२० कोटींच्या पीककर्जाचा भरणा केला आहे़ तथापि, ६१ हजार शेतकरी पीककर्ज पुनर्गठण करण्यास पात्र आहेत़ परंतु, २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़जिल्हा अग्रणी बँकेकडून पीककर्ज पुनर्गठण करण्यासाठी शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत़ आतापर्यंत ३ मेळावे झाले असून, २७ जून रोजी आणखी एक मेळावा घेतला जाणार आहे़ ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ मध्ये पीककर्ज घेतले होते़ त्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करणे म्हणजे पुनर्गठण करणे होय़ परंतू, शेतकऱ्यांचा पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़ सोमवारीही काही बँकांनी पुनर्गठणासाठी मेळावा घेतला़ परंतू, तेथेही प्रतिसाद मिळाला नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ५ वार्षिक हप्त्यामध्ये कर्ज फेडणे होय़ पुनर्गठण करून पीककर्ज घेतल्यास पहिल्या दोन वर्षात ६ टक्के व्याज दर शासन भरणार आहे़ व ६ टक्के व्याजदार संबंधीत शेतकऱ्यांनी भरणे आहे़ लातूर जिल्ह्यात २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी २०१५ - १६ मध्ये ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यात १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जाचा ५२० कोटींचा भरणा केला आहे़ त्यामुळे ६१ हजार शेतकरी ३८ कोटींच्या पीककर्ज पुनर्गठणासाठी पात्र आहेत़ गेल्या महिनाभरापासून पीककर्ज पुनर्गठण मोहिम राबविण्यात येत असली तरी ६१ हजारांपैकी केवळ २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़ सत्ताधारी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांकडून कर्ज माफीची मागणी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा लागली आहे़ त्यामुळेच पीककर्जाचे पुनर्गठण नको या मानसिकतेत शेतकरी आहेत़ त्यामुळेच कर्ज पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़