शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पीककर्ज पुनर्गठणाकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 13, 2016 23:28 IST

हणमंत गायकवाड ल्ल लातूर शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये

हणमंत गायकवाड ल्ल लातूरशेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यापैकी १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी ५२० कोटींच्या पीककर्जाचा भरणा केला आहे़ तथापि, ६१ हजार शेतकरी पीककर्ज पुनर्गठण करण्यास पात्र आहेत़ परंतु, २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़जिल्हा अग्रणी बँकेकडून पीककर्ज पुनर्गठण करण्यासाठी शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत़ आतापर्यंत ३ मेळावे झाले असून, २७ जून रोजी आणखी एक मेळावा घेतला जाणार आहे़ ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ मध्ये पीककर्ज घेतले होते़ त्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करणे म्हणजे पुनर्गठण करणे होय़ परंतू, शेतकऱ्यांचा पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़ सोमवारीही काही बँकांनी पुनर्गठणासाठी मेळावा घेतला़ परंतू, तेथेही प्रतिसाद मिळाला नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ५ वार्षिक हप्त्यामध्ये कर्ज फेडणे होय़ पुनर्गठण करून पीककर्ज घेतल्यास पहिल्या दोन वर्षात ६ टक्के व्याज दर शासन भरणार आहे़ व ६ टक्के व्याजदार संबंधीत शेतकऱ्यांनी भरणे आहे़ लातूर जिल्ह्यात २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी २०१५ - १६ मध्ये ८९३ कोटींचे पीककर्ज घेतले होते़ त्यात १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जाचा ५२० कोटींचा भरणा केला आहे़ त्यामुळे ६१ हजार शेतकरी ३८ कोटींच्या पीककर्ज पुनर्गठणासाठी पात्र आहेत़ गेल्या महिनाभरापासून पीककर्ज पुनर्गठण मोहिम राबविण्यात येत असली तरी ६१ हजारांपैकी केवळ २ हजार ४६६ शेतकऱ्यांनीच पीककर्जाचे पुनर्गठण केले आहे़ सत्ताधारी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांकडून कर्ज माफीची मागणी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा लागली आहे़ त्यामुळेच पीककर्जाचे पुनर्गठण नको या मानसिकतेत शेतकरी आहेत़ त्यामुळेच कर्ज पुनर्गठणाला प्रतिसाद मिळत नाही़