शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

तेलबियांकडे शेतक-यांची पाठ!

By admin | Updated: January 23, 2016 02:01 IST

अमरावती विभागातील स्थिती ; केवळ आठ टक्के क्षेत्रावर पेरणी.

दादाराव गायकवाड/कारंजा लाड (जि. वाशिम): बदलत्या वातावरणासह कमी होणार्‍या मागणीमुळे तेलबियांच्या पेरणीकडे अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागाच्या गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गतवर्षीप्रमाणेच यंदाही सरासरी २६ हजार ४00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार १00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. अमरावती विभागात पूर्वी तीळ, जवस, करडई, कारळ, सूर्यफूल, भुईमूग आदी तेलवाणांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होत असे. गळित हंगामात सूर्यफुलांनी बहरलेली पिवळी शेते सर्वत्र दिसायची; परंतु मागील काही वर्षांपासून सर्व सोयी-सुविधा असतानाही बदलत्या निसर्गचक्रामुळे कृषिव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचा अनिष्ट परिणाम पारंपरिक पीकपेरणीवर होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून अमरावती विभागात अत्यंत कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले असून, शेतकरी आता पेरणी करून आणखी धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे पीकपेरणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गतवर्षी अमरावती विभागात सरासरी २६ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली. यंदाही केवळ २ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच शेतकर्‍यांनी तेलबियांची पेरणी केल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतवर्षी करडईची पेरणी १ हजार ४00 हेक्टरवर झाली; यंदा मात्र केवळ ७00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकंदर, अमरावती विभागातील बदलते वातावरण, घटत चाललेली मागणी आणि नगण्य दरामुळे तेलबियांच्या पेरणीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जवसाची पेरणीच नाहीगत दोन वर्षांत अमरावती विभागात एक हेक्टरवरही जवसाची पेरणी करण्यात आलेली नाही. यावरून हे तेलवाण नामशेष होत असल्याचे दिसत आहे. तिळाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले असून, मागील दोन्ही वर्षांत प्रत्येकी २00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीक्षेत्रात ६00 हेक्टरची वाढ झाली आहे. तथापि, १४ हजार हेक्टरपैकी केवळ ८00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली असून, त्याच्या पेरणीचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे.