शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

तेलबियांकडे शेतक-यांची पाठ!

By admin | Updated: January 23, 2016 02:01 IST

अमरावती विभागातील स्थिती ; केवळ आठ टक्के क्षेत्रावर पेरणी.

दादाराव गायकवाड/कारंजा लाड (जि. वाशिम): बदलत्या वातावरणासह कमी होणार्‍या मागणीमुळे तेलबियांच्या पेरणीकडे अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागाच्या गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गतवर्षीप्रमाणेच यंदाही सरासरी २६ हजार ४00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार १00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. अमरावती विभागात पूर्वी तीळ, जवस, करडई, कारळ, सूर्यफूल, भुईमूग आदी तेलवाणांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होत असे. गळित हंगामात सूर्यफुलांनी बहरलेली पिवळी शेते सर्वत्र दिसायची; परंतु मागील काही वर्षांपासून सर्व सोयी-सुविधा असतानाही बदलत्या निसर्गचक्रामुळे कृषिव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचा अनिष्ट परिणाम पारंपरिक पीकपेरणीवर होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून अमरावती विभागात अत्यंत कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले असून, शेतकरी आता पेरणी करून आणखी धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे पीकपेरणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गतवर्षी अमरावती विभागात सरासरी २६ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली. यंदाही केवळ २ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच शेतकर्‍यांनी तेलबियांची पेरणी केल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतवर्षी करडईची पेरणी १ हजार ४00 हेक्टरवर झाली; यंदा मात्र केवळ ७00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकंदर, अमरावती विभागातील बदलते वातावरण, घटत चाललेली मागणी आणि नगण्य दरामुळे तेलबियांच्या पेरणीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जवसाची पेरणीच नाहीगत दोन वर्षांत अमरावती विभागात एक हेक्टरवरही जवसाची पेरणी करण्यात आलेली नाही. यावरून हे तेलवाण नामशेष होत असल्याचे दिसत आहे. तिळाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले असून, मागील दोन्ही वर्षांत प्रत्येकी २00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीक्षेत्रात ६00 हेक्टरची वाढ झाली आहे. तथापि, १४ हजार हेक्टरपैकी केवळ ८00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली असून, त्याच्या पेरणीचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे.