शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

पीककर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:40 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे.

- राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या कर्जासाठी मागणी केलेली नाही. खरीप पेरणीचा हंगाम संपत आला आहेच पण त्याबरोबर या कर्जासाठी बाँड द्यावा लागत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे दहा हजार रुपये बियाणे व खते खरेदीसाठी देण्याचे आदेश जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे कोट्यवधी रुपये बँकेत पडून असल्याने सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार रुपये देण्यास आढेवेढे घेतले; पण सरकारने समज दिल्यानंतर रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला; पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने या रकमेची उचल केलेली नाही. गेल्या आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील विभागीय सहनिबंधक, व जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, कोकण विभागातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून दहा हजार उचलीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १५ जुलैपर्यंत उर्वरित विभागातून केवळ २२०० शेतकऱ्यांनीच कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.