शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पीककर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:40 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे.

- राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या कर्जासाठी मागणी केलेली नाही. खरीप पेरणीचा हंगाम संपत आला आहेच पण त्याबरोबर या कर्जासाठी बाँड द्यावा लागत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे दहा हजार रुपये बियाणे व खते खरेदीसाठी देण्याचे आदेश जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे कोट्यवधी रुपये बँकेत पडून असल्याने सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार रुपये देण्यास आढेवेढे घेतले; पण सरकारने समज दिल्यानंतर रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला; पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने या रकमेची उचल केलेली नाही. गेल्या आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील विभागीय सहनिबंधक, व जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, कोकण विभागातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून दहा हजार उचलीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १५ जुलैपर्यंत उर्वरित विभागातून केवळ २२०० शेतकऱ्यांनीच कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.