शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुंबईत लेप्टोचे १५ बळी

By admin | Updated: July 11, 2015 02:08 IST

पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून

मुंबई : पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून, रुग्णांचा आकडा ४६पर्यंत वाढला आहे. एकाच दिवसात १० रुग्ण आढळल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.३ ते ९ जुलैदरम्यान मालाड परिसरात ६ जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला असल्याने या ठिकाणी पालिकेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. १ ते १० जुलैदरम्यान लेप्टोचे ४६ रुग्ण आढळून आले. जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. याच कालावधीत अनेकांना लेप्टोची लागण झाल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. साचलेल्या पाण्यात उंदराचे मूत्र मिसळून ते पायाच्या असलेल्या जखमेतून शरीरात गेल्यास लेप्टोची लागण होण्याचा धोका वाढतो. पाळीव प्राण्यांपासूनही लेप्टोचा धोका आहे. अंगदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे अशी सर्वसाधारण लक्षणे असल्यामुळे अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे जीव गमवावा लागत असल्याचे महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेने मूषक शोधमोहीम सुरू केली असून, ६ हजार २५३ घरांची पाहणी केली. ४ इमारतींच्या परिसरात, ५ चाळींमध्ये आणि साचलेल्या पाण्याच्या तीन ठिकाणी औषध फवारणी केली. (प्रतिनिधी)