शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

मुंबईत लेप्टोचे १५ बळी

By admin | Updated: July 11, 2015 02:08 IST

पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून

मुंबई : पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. जुलैमधील १० दिवसांत शहरात लेप्टोस्पायरोसीसने १५ जणांचा बळी गेला असून, रुग्णांचा आकडा ४६पर्यंत वाढला आहे. एकाच दिवसात १० रुग्ण आढळल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.३ ते ९ जुलैदरम्यान मालाड परिसरात ६ जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला असल्याने या ठिकाणी पालिकेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. १ ते १० जुलैदरम्यान लेप्टोचे ४६ रुग्ण आढळून आले. जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. याच कालावधीत अनेकांना लेप्टोची लागण झाल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. साचलेल्या पाण्यात उंदराचे मूत्र मिसळून ते पायाच्या असलेल्या जखमेतून शरीरात गेल्यास लेप्टोची लागण होण्याचा धोका वाढतो. पाळीव प्राण्यांपासूनही लेप्टोचा धोका आहे. अंगदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे अशी सर्वसाधारण लक्षणे असल्यामुळे अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे जीव गमवावा लागत असल्याचे महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेने मूषक शोधमोहीम सुरू केली असून, ६ हजार २५३ घरांची पाहणी केली. ४ इमारतींच्या परिसरात, ५ चाळींमध्ये आणि साचलेल्या पाण्याच्या तीन ठिकाणी औषध फवारणी केली. (प्रतिनिधी)