नरेंद्र जावरे - अमरावती
देशात आरोग्य विभागामार्फत पोलिओमुक्तीवर भर दिला जात आहे. पोलिओ निमरूलनाकडे देशाची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे कुष्ठरुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत असल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक कुष्ठरुग्ण उत्तर प्रदेशात असले तरी कुष्ठरोगामुळे कायमचे अपंगत्व आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. ठाणो, नाशिक व चंद्रपुरात सर्वाधिक कुष्ठरोगी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमांतर्गत 2क्13-14 या वर्षात केलेल्या सव्रेक्षणात कुष्ठरुग्णांची आकडेवारी प्राप्त झाली आहे. उत्तर प्रदेशात नवीन कुष्ठरुग्णांची संख्या 22,565 असून त्यापैकी 722 जणांना कायम अपंगत्व आले आहे. कुष्ठरोगामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तिस:या क्रमांकावर असलेल्या छत्तीसगड राज्यात 8,519 रुग्णांपैकी 6,क्2क् रुग्णांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर महाराष्ट्रातील 16,4क्क् नवीन रुग्णांपैकी 813 कुष्ठरुग्णांना कायमचे अपंगत्व आले आहे.
देशात गतवर्षी 1,34,752 तर या वर्षी 1,26,913 रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी 671 रुग्णांना कायम अपंगत्व आले होते. या वर्षी 813 अर्थात 142 रुग्णांना कायम अपंगत्व आले आहे.
राज्यात ठाणो, चंद्रपूर नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण
राज्यात सद्य:स्थितीत ठाणो जिल्ह्यात 2,716 रुग्ण असून, चंद्रपूर 1,293, नाशिक 1,252, जळगाव 966,
नागपूर 745, पुणो 767, रायगड 759, भंडारा 5क्5, नंदुरबार 498, धुळे 485, यवतमाळ 457, अमरावती 415,
वर्धा 3क्3 रुग्ण असून राज्यात
सर्वात कमी दोन आकडे
असलेली रुग्ण संख्या सिंधुदुर्ग
येथील 85 आहे.
समाजात जनजागृती करायला हवी
आपला देश पोलिओमुक्त झाला आहे. परंतु, कुष्ठरोगी अपंगांची संख्या वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. समाजात जनजागृती करुन रुग्णांना त्वरित उपचारासाठी
आणून कुष्ठरोग थांबवणो गरजेचे असल्याचे मत कोठारा कम्युनिटी हॉस्पिटलच्या दी लेप्रसी मिशनचे कार्यक्रम अधिकारी सुरेश धोंडगे यांनी व्यक्त केले.