शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ दणाणले : उमटले तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:15 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एक ओळीचा ठराव सभागृहाने एकमुखाने करावा, अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये उतरले. चर्चा नको, आरक्षण द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. काही आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला.विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चा नको, मराठा आरक्षण द्या, अशी मागणी केली आणि विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. सत्तारूढ आमदारही आरक्षणाची मागणी करीत होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळामुळे दुपारी ३पर्यंत तहकूब करण्यात आले.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मोर्चासंदर्भात निवेदन केल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसून मोर्चेकºयांचे त्यामुळे समाधान झालेले नाही, अशी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.मोर्चा शांततेत, आमदार भिडलेआपल्या मागण्यांसाठी एकीकडे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत निघालेला मराठा क्रांतीचा मूकमोर्चा, तर दुसरीकडे विधान भवनाच्या पायºयांवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार हमरीतुमरीवर उतरून एकमेकांशी भिडल्याचे चित्र विधान भवनाच्या पायºयांवर पाहायला मिळाले.आपण मराठा समाजाचे कैवारी आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सदस्य अक्षरश: एकमेकांशी भिडले. जोरदार घोषणाबाजी करत या आमदारांनी कुरघोडीचा प्रयत्न चालविल्याने विधान भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विधान भवनातील मार्शल्सना धाव घ्यावी लागली.विधान परिषदेत धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीका केली. मोर्चाच्या मागण्यांपैकी निम्म्यांनाही सरकारने हात घातलेला नाही. सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची मोर्चेकºयांची भावना झाली आहे, असा दावा त्यांनी केला.सरकारने केलेल्या घोषणांच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रम कधी देणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. अन्य समाजांना आरक्षण देण्याबाबत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी औदार्य दाखवले तसेच आता मराठा समाजाबाबत दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनी सभात्याग केला.चंद्रकांत पाटील यांनी आरोप फेटाळलेमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा या तीन बाबी राज्य सरकारच्या हाती नसल्याचे सांगत त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.