शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ दणाणले : उमटले तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:15 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एक ओळीचा ठराव सभागृहाने एकमुखाने करावा, अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये उतरले. चर्चा नको, आरक्षण द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. काही आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला.विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चा नको, मराठा आरक्षण द्या, अशी मागणी केली आणि विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. सत्तारूढ आमदारही आरक्षणाची मागणी करीत होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळामुळे दुपारी ३पर्यंत तहकूब करण्यात आले.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मोर्चासंदर्भात निवेदन केल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसून मोर्चेकºयांचे त्यामुळे समाधान झालेले नाही, अशी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.मोर्चा शांततेत, आमदार भिडलेआपल्या मागण्यांसाठी एकीकडे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत निघालेला मराठा क्रांतीचा मूकमोर्चा, तर दुसरीकडे विधान भवनाच्या पायºयांवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार हमरीतुमरीवर उतरून एकमेकांशी भिडल्याचे चित्र विधान भवनाच्या पायºयांवर पाहायला मिळाले.आपण मराठा समाजाचे कैवारी आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सदस्य अक्षरश: एकमेकांशी भिडले. जोरदार घोषणाबाजी करत या आमदारांनी कुरघोडीचा प्रयत्न चालविल्याने विधान भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विधान भवनातील मार्शल्सना धाव घ्यावी लागली.विधान परिषदेत धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीका केली. मोर्चाच्या मागण्यांपैकी निम्म्यांनाही सरकारने हात घातलेला नाही. सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची मोर्चेकºयांची भावना झाली आहे, असा दावा त्यांनी केला.सरकारने केलेल्या घोषणांच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रम कधी देणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. अन्य समाजांना आरक्षण देण्याबाबत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी औदार्य दाखवले तसेच आता मराठा समाजाबाबत दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनी सभात्याग केला.चंद्रकांत पाटील यांनी आरोप फेटाळलेमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा या तीन बाबी राज्य सरकारच्या हाती नसल्याचे सांगत त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.