शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

कायदेमंडळ, प्रशासनाची कुचराई

By admin | Updated: February 5, 2016 04:22 IST

कायदे मंडळ, न्यायपालिका व प्रशासन हे लोकशाही व्यवस्थेतील तीन महत्त्वाचे स्तंभ मानण्यात येतात, परंतु यातील कायदेमंडळ व प्रशासन हे त्यांची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडताना दिसून येत नाहीत

नागपूर : कायदे मंडळ, न्यायपालिका व प्रशासन हे लोकशाही व्यवस्थेतील तीन महत्त्वाचे स्तंभ मानण्यात येतात, परंतु यातील कायदेमंडळ व प्रशासन हे त्यांची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडताना दिसून येत नाहीत. कायदे मंडळातील सदस्य म्हणजेच, राजकारण्यांना तर काम करणे आवडतच नाही, या शब्दांत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सरकार व राजकारण्यांवर टीका केली. ‘रोटरी क्लब आॅफ नागपूर’तर्फे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात जनहित याचिकांच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. विदर्भवादी असलेल्या अणे यांनी महाधिवक्ता पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच ते वादात आहेत. विदर्भ राज्याच्या संदर्भातील त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता व विरोधकांसह शासनात सहभागी असलेल्या शिवसेनेदेखील या मुद्द्यावरून शासनावर जोरदार टीका केली होती. दोन आठवडे हिवाळी अधिवेशनाचे कामकाजदेखील प्रभावित झाले होते. असे असताना त्यांनी केलेल्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.अणे यांनी आपल्या भाषणात या मुद्यावर पुन्हा बोट ठेवले. वेगळ्या विदर्भ राज्यासंदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे मौलिक असे दोन आठवडे वाया गेले. कायदेमंडळातील सदस्यांना कायदे बनविण्याखेरीज सर्व बाबींमध्ये रस असतो, हेच या कृतीतून दिसून आले, असे ते म्हणाले. महत्त्वाच्या तीन स्तंभांपैकी कायदेमंडळ व प्रशासन हे डळमळीत होत आहे. जर कायदेमंडळ व प्रशासनाकडून योग्य काम झाले नाही तर संपूर्ण लोकशाही प्रणालीचे संतुलन बिघडण्याची भीती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)न्यायमूर्ती सर्व स्तरांतून यावेतदेशात न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडेच ठेवले आहे. मोदी सरकारने यात बदल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावरदेखील सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला. न्यायमूर्तींची नियुक्ती होत असताना त्यात केवळ समाजातील एका ठराविक स्तरांतील लोकांना प्राधान्य देण्यात येते. समाजातील सर्व स्तरांतून नियुक्ती होत नसल्यामुळे न्यायप्रणालीचे संतुलन बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे न्यायमूर्ती सर्व स्तरांमधून यायला हवेत, असेही महाधिवक्ता अणे म्हणाले.