शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर विधान परिषदेतील कामकाज ठप्प

By admin | Updated: July 29, 2016 18:32 IST

भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकी ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ - भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकी ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अखंड महाराष्ट्र आमच्या अस्मितेचा विषय आहे, याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केला.

शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना नाना पटोले यांनी मांडलेला ठराव गंभीर बाब असल्याचे सांगत मुंडे यांनी लोकसभेची कामकाज पत्रिकाच सभागृहात फडकवली. तर, अखंड महाराष्ट्र हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. लोकसभेतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना विचारूनच ठराव मांडला असेल.

यावरून अखंड महाराष्ट्राच्या विरोधात भाजपाचे कारस्थान असल्याचा वास येतो. नीलम गो-हें यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. आमच्या सर्वांच्या अस्मितेचा हा विषय असताना विधी व न्याय विभाग अस्मितेवर मत नोंदविणार काय, असा सवाल राणे यांनी केला. आमच्या अस्मितेसाठी तर सभापतींने सर्वांचे नेतृत्व करावे, अशी जोरदार मागणी राणे यांनी केली.

राज्याची विधानसभा आणि विधान परिषद अखंड महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे शिवसेनेच्या नीलम गो-हे म्हणाल्या. अखंड महाराष्ट्राच्या बाजूने याआधी अनेकदा विधिमंडळात ठराव करण्यात आले आहेत. तसेच या विषयावरील चर्चेसाठी गेल्या अधिवेशनात विधानपरिषद नियम २३ अन्वये प्रस्ताव दिल्याची आठवण गो-हे यांनी करून दिली. अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयाला तारीख पे तारीख न देता चर्चा करण्याची मागणी गो-हे यांनी केली.

अखंड महाराष्ट्रावरुन सुरु असलेल्या या गदारोळात भाजपा विरूद्ध अख्खे सभाग्रह असे चित्र निर्माण झाले होते. सभाग्रहातील गोंधळाच्या वातवावरणामुळे सुरूवातीला दहा मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर गोंधळ वाढतच गेल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे सभापतींनी जाहीर केले. जोगेंद्र कवाडेंचा जय विदर्भ एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर आक्रमक झाले असताना काँग्रेसचे सहयोगी सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी मात्र वेगळ्या विदर्भाचा नारा दिला. तुम्ही सर्व अखंड महाराष्ट्राचा मुद्दा मांडता तशी आमची वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. हा कोणत्या एका पक्षाचा मुद्दा नाही. नागपूर करारानुसार विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. मात्र, या नागपूर करारातील शिफारसींची पुर्तता केली जात नाही, असा आरोप कवाडे यांनी केला. कवाडे यांची वेगळी भूमिका जाणवताच विरोधी बाकावरील सदस्यांनी गदारोळाला सुरुवात केली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाची अडचणवेगळ्या विदर्भास शिवसेनाचा तीव्र विरोध आहे. विधिमंडळात वेळोवेळी शिवसेनेने तशी भूमिकाही मांडली. आधीच विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यातच शिवसेनेची त्यांना साथ आहे. गेल्या मार्च मधील अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनेने एकत्रितपणे नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव सभापतींकडे दिला आहे.

विधानपरिषदेच्या इतिहासात या नियमान्वये कुणीही अद्यापपर्यंत प्रस्ताव दिलेला नाही. या प्रस्तावावर मतदान घेण्याची कायद्यात तरतूद आहे. प्रस्ताव चर्चेला आल्यास विधानपरिषदेत भाजपाची कोंडी होवू शकते. या प्रस्तावावर सभापतींनी निर्णय घेतला नसल्याने प्रलंबित आहे. या प्रस्तावाचा शुक्रवारी पुन्हा पुनरूच्चार झाला.अहो, मी काही पाकीस्तानात राहत नाही- सभापती

सभागृहात सभापती उभे असताना अथवा बोलत असताना अन्य कोणीही सदस्याने मध्ये न बोलण्याचा संकेत आहे. पावसाळी अधिवेशनात मात्र विरोधी बाकांवरील विशेषत: राष्ट्रवादीचे सदस्य वारंवार सभापतींचे बोलणे चालू असताना मध्येच उठून आपला विषय रेटत असल्याचे वारंवार दिसून आले. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून हा प्रकार सहन करणा-या सभापतींचा शुक्रवारी मात्र कडेलोट झाला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्दयावर ‘अहो, मी काही पाकिस्तानात राहत नाही. मीही महाराष्ट्रातच राहतो. मला माझे म्हणणे तरी मांडू देणार आहात की नाही, असा संतप्त सवाल करत सभापतींनी विरोधकांना रोखले.