शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

विधानपरिषद एकत्रच

By admin | Updated: October 16, 2015 03:16 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली

अतुल कुलकर्णी,मुंबईकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली. एकत्र लढल्यास फायदा होईल ,असा सूर त्यात निघाला. आजची बैठक प्राथमिक स्वरुपाची होती. सविस्तर मतदारसंघ निहाय बैठक लवकरच घेतली जाईल,असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एकत्र लढल्याचा फायदा नक्कीच होईल, त्यामुळेच आम्ही आज बैठक घेतली व एकमत केले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.मुंबईतून भाई जगताप (काँग्रेस), रामदास कदम (शिवसेना), धुळे-नंदूरबारमधून अंबरीश पटेल (काँग्रेस), कोल्हापूरहून महादेवराव महाडिक (काँग्रेस), नागपूरहून राजेंद्र मुळक (काँग्रेस), सोलापूरहून दिपक साळुंके (राष्ट्रवादी), अकोला-वाशिम-बुलडाणाहून गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) आणि अहमदनगरहून अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) अशा आठ जणांची मुदत जानेवारीत संपणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सध्या या सगळ्या स्थानिक प्राधिकरणांमध्ये कोणत्या पक्षाचे किती बलाबल आहे याचीही चर्चा यावेळी झाली. शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या चार जागा सध्या आहेत. तर व्यवस्थित नियोजन केले आणि भाजपा शिवसेना दुहीचा फायदा घेतला तर आपण चांगल्या जागा निवडूण आणू शकतो अशी चर्चाही यावेळी झाली.