शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

विधानपरिषद एकत्रच

By admin | Updated: October 16, 2015 03:16 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली

अतुल कुलकर्णी,मुंबईकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली. एकत्र लढल्यास फायदा होईल ,असा सूर त्यात निघाला. आजची बैठक प्राथमिक स्वरुपाची होती. सविस्तर मतदारसंघ निहाय बैठक लवकरच घेतली जाईल,असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एकत्र लढल्याचा फायदा नक्कीच होईल, त्यामुळेच आम्ही आज बैठक घेतली व एकमत केले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.मुंबईतून भाई जगताप (काँग्रेस), रामदास कदम (शिवसेना), धुळे-नंदूरबारमधून अंबरीश पटेल (काँग्रेस), कोल्हापूरहून महादेवराव महाडिक (काँग्रेस), नागपूरहून राजेंद्र मुळक (काँग्रेस), सोलापूरहून दिपक साळुंके (राष्ट्रवादी), अकोला-वाशिम-बुलडाणाहून गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) आणि अहमदनगरहून अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) अशा आठ जणांची मुदत जानेवारीत संपणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सध्या या सगळ्या स्थानिक प्राधिकरणांमध्ये कोणत्या पक्षाचे किती बलाबल आहे याचीही चर्चा यावेळी झाली. शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या चार जागा सध्या आहेत. तर व्यवस्थित नियोजन केले आणि भाजपा शिवसेना दुहीचा फायदा घेतला तर आपण चांगल्या जागा निवडूण आणू शकतो अशी चर्चाही यावेळी झाली.