शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

विधान परिषद पाच वेळा तहकूब

By admin | Updated: April 2, 2015 03:02 IST

गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव

मुंबई : गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या मागणीवरून बुधवारी विधान परिषदेचे कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब झाले. अखेरीस चर्चेला प्रारंभ झाला तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माणिकराव ठाकरे यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे गृह खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेबाबत विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची व सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. माणिकराव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. ही मागणी स्वीकारण्यास संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विरोध केला. त्यामुळे सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली व सर्वप्रथम २० मिनिटांकरिता कामकाज तहकूब झाले. त्यानंतर चारवेळा दहा मिनिटांकरिता कामकाज तहकूब करण्यात आले.अखेरीस नियम ९७ अन्वये चर्चेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, नागपूर येथील मध्यवर्ती तुुरुंगातून पाच कैदी पळून गेले ही अत्यंत गंभीर घटना आहे. येथील तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे हे त्यांच्या केबिनमध्ये कैद्यांच्या नातलगांना बोलावून त्यांचे वाढदिवस साजरे करीत होते. नगरमधील कायदा व सुव्यवस्थाही ढासळलेली आहे. एक महिन्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३० केसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात जर ही अवस्था असेल तर राज्यात कायद्याचे राज्य आहे हे आपण कसे म्हणणार, असा सवाल मुंडे यांनी केला. निवडणूक प्रचारात राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र त्याला आपण पात्र नाही अशी कबुली आता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी केली तर नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी केली. यावेळी भाई जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड, हेमंत टकले यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)