शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

विधान परिषद पाच वेळा तहकूब

By admin | Updated: April 2, 2015 03:02 IST

गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव

मुंबई : गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या मागणीवरून बुधवारी विधान परिषदेचे कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब झाले. अखेरीस चर्चेला प्रारंभ झाला तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माणिकराव ठाकरे यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे गृह खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेबाबत विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची व सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. माणिकराव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. ही मागणी स्वीकारण्यास संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विरोध केला. त्यामुळे सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली व सर्वप्रथम २० मिनिटांकरिता कामकाज तहकूब झाले. त्यानंतर चारवेळा दहा मिनिटांकरिता कामकाज तहकूब करण्यात आले.अखेरीस नियम ९७ अन्वये चर्चेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, नागपूर येथील मध्यवर्ती तुुरुंगातून पाच कैदी पळून गेले ही अत्यंत गंभीर घटना आहे. येथील तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे हे त्यांच्या केबिनमध्ये कैद्यांच्या नातलगांना बोलावून त्यांचे वाढदिवस साजरे करीत होते. नगरमधील कायदा व सुव्यवस्थाही ढासळलेली आहे. एक महिन्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३० केसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात जर ही अवस्था असेल तर राज्यात कायद्याचे राज्य आहे हे आपण कसे म्हणणार, असा सवाल मुंडे यांनी केला. निवडणूक प्रचारात राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र त्याला आपण पात्र नाही अशी कबुली आता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी केली तर नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी केली. यावेळी भाई जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड, हेमंत टकले यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)