शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विधान परिषदेत कोंडी कायम

By admin | Updated: March 17, 2017 01:10 IST

शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीवर अडून बसल्याने गुरुवारीदेखील सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कालच बीड, लातूर आणि परभणी आदी भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असताना सरकार कर्जमाफीबाबत चकार शब्द काढत नाही. अद्याप कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही, नवीन कर्ज नाही त्यामुळे शेतकरी वर्ग समूळ नष्ट व्हावा, असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सरकारसमोर केवळ उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असल्याचे विधान केल्याचा आरोप काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी केला. तर, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये’ असे विधान केल्याचे सांगून भट्टाचार्य यांच्या विधानावर आक्षेप घेतला. १ लाख ४० हजार कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध का, असा सवाल काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी केला. यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजीला सुरुवात केली. या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असल्याने हा निर्णय घाईघाईत घेता येणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गटनेत्यांसोबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री सभागृहात निवेदनही करणार आहेत, त्यामुळे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले. त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला १ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. (प्रतिनिधी)गदारोळातच अशासकीय विधेयके सादर कामकाज पुन्हा सुरू झाले तरीही विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. सभापतींनी कामकाज सुरळीत चालविण्याचा प्रयत्न केला. अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतानाच पुरवणी मागण्या संमत करणे आवश्यक असल्याचे म्हटले. मात्र, विरोधकांनी कर्जमाफीशिवाय कसलेच कामकाज होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या गदारोळातच सभापतींनी अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर केल्याची घोषणा केली. तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या ज्या आवाजी मतांनी संमत करण्यात आल्याची घोषणा सभापतींनी केली. त्यानंतर गदारोळातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्याची घोषणा केली.