शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत कोंडी कायम

By admin | Updated: March 17, 2017 01:10 IST

शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीवर अडून बसल्याने गुरुवारीदेखील सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कालच बीड, लातूर आणि परभणी आदी भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असताना सरकार कर्जमाफीबाबत चकार शब्द काढत नाही. अद्याप कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही, नवीन कर्ज नाही त्यामुळे शेतकरी वर्ग समूळ नष्ट व्हावा, असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सरकारसमोर केवळ उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असल्याचे विधान केल्याचा आरोप काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी केला. तर, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये’ असे विधान केल्याचे सांगून भट्टाचार्य यांच्या विधानावर आक्षेप घेतला. १ लाख ४० हजार कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध का, असा सवाल काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी केला. यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजीला सुरुवात केली. या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असल्याने हा निर्णय घाईघाईत घेता येणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गटनेत्यांसोबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री सभागृहात निवेदनही करणार आहेत, त्यामुळे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले. त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला १ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. (प्रतिनिधी)गदारोळातच अशासकीय विधेयके सादर कामकाज पुन्हा सुरू झाले तरीही विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. सभापतींनी कामकाज सुरळीत चालविण्याचा प्रयत्न केला. अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतानाच पुरवणी मागण्या संमत करणे आवश्यक असल्याचे म्हटले. मात्र, विरोधकांनी कर्जमाफीशिवाय कसलेच कामकाज होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या गदारोळातच सभापतींनी अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर केल्याची घोषणा केली. तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या ज्या आवाजी मतांनी संमत करण्यात आल्याची घोषणा सभापतींनी केली. त्यानंतर गदारोळातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्याची घोषणा केली.