शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

अन्नसुरक्षा योजनेवरून विधान परिषदेत गदारोळ

By admin | Updated: March 13, 2015 01:37 IST

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य देण्याच्या योजनेवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि

मुंबई : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य देण्याच्या योजनेवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अन्नसुरक्षेअंतर्गत केशरी कार्डधारकांचे धान्य वितरण बंद केल्याबाबतचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह तब्बल ३२ सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही आघाडी सरकारने त्यात १२० कोटींची भर घालत १ कोटी ७० लाख केशरी रेशनकार्डधारकांना योजनेत सामावून घेतले होते. पण केंद्र आणि राज्यात सत्ताबदल होताच, केशरी कार्डधारकांना योजनेतून वगळण्यात आले. त्यांना पुन्हा धान्य देण्याचा मुद्दा विरोधी बाकावरील सदस्यांनी लावून धरला. यावर, एपीएल कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी ४४ हजार आणि शहरी भागासाठी ५९ हजार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे उत्तर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिले. यावर सुनील तटकरे यांनी हरकत घेत सांगितले की, उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्राच्या नियोजन म्हणजेच आताच्या नीति आयोगाला आहे. त्यानंतर केंद्र सरकार ठरवते. या प्रक्रियेला बराच काळ लागू शकतो. पण तोपर्यंत या पावणेदोन कोटी कुटुंबांनी काय करायचे, असा सवाल तटकरेंनी केला. राज्याच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे. मात्र, बीपीएल धारकांना या योजनेतून अन्न दिले जात आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत केशरी कार्डधारकांबाबत निर्णय घेऊ, असे उत्तर बापट यांनी दिले.