शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

समुद्राच्या लाटांवर रंगली रामकथा

By admin | Updated: April 3, 2017 21:36 IST

समुद्राच्या लाटांवर स्वारहोण्यातील मजा अनोखीच आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक कोकणाची वाट धरतात.

शिवाजी गोरे / ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 3 - समुद्राच्या लाटांवर स्वारहोण्यातील मजा अनोखीच आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक कोकणाची वाट धरतात. समुद्राच्या ओढीनेच मग कुणी उसळत्या लाटांमध्ये जाऊन विवाहही करतात. आता तर समुद्राच्या या आकर्षणातून रामकथांचा कार्यक्रम दापोलीतील समुद्राच्या लाटांवर साजरा झाला आहे. ‘श्री राम,  जय राम, जय जय राम...’ असा रामनामाचा जप करत अथांग लाटांवर स्वार होत अरबी समुद्राच्या साक्षीने प्रसिद्ध राम कथाकार संत नामदेव महाराज लबाडे यांनी बोटीवर रामकथा रंगवली.

भूतलावर आपण आजपर्यंत अनेक रामकथा ऐकल्या व वाचल्या असतील. मात्र, समुद्रातील पहिली रामकथा ऐकण्याचे भाग्य दापोली तालुक्यातील पाजपंढरीवासीयांना मिळाले. रामजन्माच्या पूर्वसंध्येला पाजपंढरी रामजन्म उत्सव कमिटीने रामकथेचे आयोजन केले होते. जुन्या कुलाबकर मंडळींनी या रामकथेचे आयोजन चक्क समुद्रातील बोटीवर केले होते. त्यामुळे आजची कथा जरा वेगळीच होती.
अरबी समुद्राच्या उसळलेल्या अथांग लाटा. भणाणणारा वारा. अशा वातावरणात बोटीत चक्क रामकथा. भजनाने भक्त मंडळी भारावून गेली होती. नामदेव महाराज लबडे यांनी राम - लक्ष्मण, सीता - केवट यांची कथा अतिशय मार्मिक शब्दात सादर केली. राम कथेतील अनेक प्रसंगाचे दाखले देऊन लबडे महाराजांनी श्रद्धा व निष्कामसेवा याबद्दल सांगितले. प्रभू रामचंद्राबाबत अनेक दाखले देऊन रामचंद्र महान व आदर्श कसे होते. समाजाने प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा आदर्श घ्यावा. रामाचा १४ वर्षाचा इतिहास व केवट भेट याचे अनेक दाखले देऊन लबडे महाराजांनी सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले. आजपर्यंत आपण हजारो रामकथा सादर केल्या आहेत. मात्र आज प्रभू रामचंद्राच्या कृपेने आज आपल्याला अरबी समुद्रात रामकथा सांगण्याचे भाग्य मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमितील ऐतिहासिक किल्ले जवळून पाहता आले. अरबी समुद्रात रामकथा सादर करुन आपण धन्य झालो. आता एकदा हवेत म्हणजे विमानात कथा सादर करुन इच्छा पूर्ण करायची असल्याचे लबडे महाराज म्हणाले.
वादग्रस्त रामजन्मभूमीवर राममंदिर होणारच असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत राममंदिर झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. कोकणातील सर्वात मोठा रामजन्म उत्सव व दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात होतो. या ठिकाणी पाच दिवस यात्रा असते. रामजन्म उत्सवानिमित्त गेली चार दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अरबी समुद्राच्या काठावर असणाºया पाजपंढरी गावातील रामाचे मंदीर सर्वांचे खास आकर्षण आहे.