शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अवैध बांधकामांना कायदेशीर दिलासा

By admin | Updated: April 1, 2017 21:03 IST

नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करणा-यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 1 - नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करणा-यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार विधेयक शनिवारी विधिमंडळात मंजूर करण्यात आले. दंड भरुन ही बांधकामे नियमित होतील. नव्या विधेयकातून 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण देण्यात आले आहे. 
 
त्यामुळे मुंबई, ठाणे, उल्हासनगर पिंपरी-चिंचवड, पुणे नाशिक शहरातील  मोठया प्रमाणावरील अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. विशेष करुन दिघ्यातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. दिघ्यामध्ये मोठया प्रमाणावर अनधिकृत इमारती असून, या इमारती पाडण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे लाखो कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट होते. 
 
मागच्या आठवडयात यासंबंधी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अनधिकृतबांधकामांना संरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. नवी मुंबईचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांची एकारात्रीत तडकाफडकी बदली करण्यात आली.