शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

लीजवरील जमिनी होणार मालकीच्या

By admin | Updated: February 18, 2016 07:06 IST

मुंबई : शासनाने भाडेकरारावर दिलेल्या ‘ब’ वर्गातील जमिनींचा मालकी हक्क संबंधितांना देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. प्रचलित रेडिरेकनरचा दर भरुन या जमिनी संबंधितांच्या नावे कायम करता येणार आहेत.

मुंबई : शासनाने भाडेकरारावर (लीज) दिलेल्या ‘ब’ वर्गातील जमिनींचा मालकी हक्क संबंधितांना देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी प्रचलित रेडिरेकनरचा दर भरुन या जमिनी संबंधितांच्या नावे कायम करता येणार आहेत. धारणाधिकारातील या बदलासाठी १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून त्यानुसार भोगवटादार वर्ग - २ किंवा सरकारी पट्टेदार या तत्वावर वाटप झालेल्या सरकारी जमिनीचे धारणाधिकार ‘रुपांतरण अधिमूल्य’ आकारुन भोगवटादार वर्ग-१ अशी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबतचे एक विधेयक राज्य विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. ही तरतूद कायद्यात समाविष्ट झाल्यानंतर शासनाने प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या स्वतंत्र समितीने दिलेल्या अहवालाचा योग्य परामर्श घेऊन कोणकोणत्या संवगार्तील शासकीय जमिनीचे धारणाधिकार भोगवटादार वर्ग-१ यामध्ये रुपांतरीत करणे हितावह ठरेल, त्यासाठी किती प्रमाणात रुपांतरण अधिमूल्य भरावे लागेल, कोणकोणत्या अटी व शर्तींची पूर्तता करावी लागेल आणि सदर रुपांतरणाची कार्यवाही कोणत्या स्तरावर करण्यात यावी, याविषयी सविस्तर धोरण तयार करावे व त्यास मंत्रीमंडळाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्रीमंडळाने दिले आहेत. मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार याबाबतचे नियम तयार करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.कोणाला होणार फायदा ?राज्य शासनाने शेती आणि अकृषिक प्रयोजनासाठी शासकीय जमिनी कब्जेहक्काने व भाडेपट्टयाने दिलेल्या आहेत. तसेच शेतजमीन व कूळ कायदा विषयक अधिनियमान्वये ग्रामीण भागात शेती करण्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत. या जमिनी संबंधित शेतकरी अथवा भोगवटादाराकडे भोगवटादार वर्ग - २ या प्रवर्गात असतात. अशा प्रकारच्या शेतजमिनी हस्तांतरण करणे, विकसित करण्यासाठी अकृषिक परवानगी घेणे, गहाण अथवा तारण ठेवणे इत्यादींसाठी वेळोवेळी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती घ्यावी लागते. तसेच नजराणा किंवा अनर्जित रक्कम भरावी लागते. हे करीत असताना शेतकरी अथवा भोगवटादार यांचा बराच कालावधी लागतो. म्हणून सदर कालावधी कमी करणे प्रशासकीय तसेच उद्योग यासाठी सुगमता व सुलभता आणणे आणि अटी व शर्तीच्या भंगाची प्रकरणे कमी करणे या उद्देशाने १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दिशादर्शक निर्णय घेतला असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.या निर्णयामुळे - प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीमार्फत विर्दभातील नझूल जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्याबाबत अभ्यास सुरु.मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय भाडेपट्टा जमिनीचे रुपांतरण भोगवटादार वर्ग-१ मध्ये कशा प्रकारे करता येईल याबाबत अभ्यास करुन शिफारस करण्यासाठी प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार.