शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कष्ट कमी केल्यास शेतीकडे ओढा : मानकर

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर

दापोली : सद्यस्थितीत कोकणात शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब खूपच कमी होत आहे. काही प्रमाणात येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. तथापी शक्य तेथे यांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीमधील कष्ट कमी केल्यास, सुरक्षित अशा यंत्राचा अथवा अवजारांचा वापर केल्यास शेती करण्यामागे कोकणवासीयांचा ओढा वाढेल आणि पर्यायाने आज ओस पडत चाललेल्या शेतीला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोकणातून होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर यांनी व्यक्त केला.दापोली येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, आज शेती, अवजारे, साधने निर्माण करताना श्रमविज्ञान शास्त्र आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तरीसुद्धा याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचाही विचार केला गेल्यास अधिक प्रमाणात श्रम कमी करणे शक्य होईल. यासाठी लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही डॉ. मानकर यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय श्रमविज्ञान समितीचे अध्यक्ष आणि आय. आय. टी., मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, शेतीसाठी अत्याधुनिक अवजारे, साधने वापरल्यास श्रम कमी होतील. त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असण्यावर भर दिला पाहिजे. आय. आय. टी., मुंबई आणि दापोली कृ षी विद्यापीठाने एकत्रितपणे काम केल्यास निर्माण होणारी अवजारे, साधने अधिक सुकर होतील आणि त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. मानकर यांनी शेतीसाठी वापरावयाची साधने व याबाबतचे नवीन, प्रगत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. लक्ष्मण गीते, कृषियंत्र व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील हिने केले. डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे कुलगुरूंचे आवाहन यांत्रिकीपध्दतीचा अधिक वापर झाल्यास फायदाकष्ट कमी केल्यास अधिक उत्पादन कार्यक्षमता वाढविण्याचा दिला मानकर यांनी सल्ला कृषी विकासासाटी एकत्रित काम करण्याचे सूतोवाचनव्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदा