शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कष्ट कमी केल्यास शेतीकडे ओढा : मानकर

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर

दापोली : सद्यस्थितीत कोकणात शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब खूपच कमी होत आहे. काही प्रमाणात येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. तथापी शक्य तेथे यांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीमधील कष्ट कमी केल्यास, सुरक्षित अशा यंत्राचा अथवा अवजारांचा वापर केल्यास शेती करण्यामागे कोकणवासीयांचा ओढा वाढेल आणि पर्यायाने आज ओस पडत चाललेल्या शेतीला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोकणातून होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर यांनी व्यक्त केला.दापोली येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, आज शेती, अवजारे, साधने निर्माण करताना श्रमविज्ञान शास्त्र आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तरीसुद्धा याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचाही विचार केला गेल्यास अधिक प्रमाणात श्रम कमी करणे शक्य होईल. यासाठी लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही डॉ. मानकर यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय श्रमविज्ञान समितीचे अध्यक्ष आणि आय. आय. टी., मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, शेतीसाठी अत्याधुनिक अवजारे, साधने वापरल्यास श्रम कमी होतील. त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असण्यावर भर दिला पाहिजे. आय. आय. टी., मुंबई आणि दापोली कृ षी विद्यापीठाने एकत्रितपणे काम केल्यास निर्माण होणारी अवजारे, साधने अधिक सुकर होतील आणि त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. मानकर यांनी शेतीसाठी वापरावयाची साधने व याबाबतचे नवीन, प्रगत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. लक्ष्मण गीते, कृषियंत्र व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील हिने केले. डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे कुलगुरूंचे आवाहन यांत्रिकीपध्दतीचा अधिक वापर झाल्यास फायदाकष्ट कमी केल्यास अधिक उत्पादन कार्यक्षमता वाढविण्याचा दिला मानकर यांनी सल्ला कृषी विकासासाटी एकत्रित काम करण्याचे सूतोवाचनव्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदा