शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कष्ट कमी केल्यास शेतीकडे ओढा : मानकर

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर

दापोली : सद्यस्थितीत कोकणात शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब खूपच कमी होत आहे. काही प्रमाणात येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. तथापी शक्य तेथे यांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीमधील कष्ट कमी केल्यास, सुरक्षित अशा यंत्राचा अथवा अवजारांचा वापर केल्यास शेती करण्यामागे कोकणवासीयांचा ओढा वाढेल आणि पर्यायाने आज ओस पडत चाललेल्या शेतीला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोकणातून होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर यांनी व्यक्त केला.दापोली येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, आज शेती, अवजारे, साधने निर्माण करताना श्रमविज्ञान शास्त्र आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तरीसुद्धा याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचाही विचार केला गेल्यास अधिक प्रमाणात श्रम कमी करणे शक्य होईल. यासाठी लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही डॉ. मानकर यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय श्रमविज्ञान समितीचे अध्यक्ष आणि आय. आय. टी., मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, शेतीसाठी अत्याधुनिक अवजारे, साधने वापरल्यास श्रम कमी होतील. त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असण्यावर भर दिला पाहिजे. आय. आय. टी., मुंबई आणि दापोली कृ षी विद्यापीठाने एकत्रितपणे काम केल्यास निर्माण होणारी अवजारे, साधने अधिक सुकर होतील आणि त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. मानकर यांनी शेतीसाठी वापरावयाची साधने व याबाबतचे नवीन, प्रगत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. लक्ष्मण गीते, कृषियंत्र व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील हिने केले. डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे कुलगुरूंचे आवाहन यांत्रिकीपध्दतीचा अधिक वापर झाल्यास फायदाकष्ट कमी केल्यास अधिक उत्पादन कार्यक्षमता वाढविण्याचा दिला मानकर यांनी सल्ला कृषी विकासासाटी एकत्रित काम करण्याचे सूतोवाचनव्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदा