शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

पालघरच्या पाणी पुरवठ्याला गळती

By admin | Updated: January 7, 2017 03:24 IST

पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण

निखिल मेस्त्री,नंडोरे (ता. पालघर)- पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण होत चालली असून काही ठिकाणी या वाहिनीला छिद्रे पडून व एअर व्हॉल्व्हच्या जोडणीच्या ठिकाणी भेगा पडून त्यातून गळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचा सांभाळ करणारी नगरपरिषद प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या गळतीवरून स्पष्ट होत आहे.वाघोबा खिंडीच्या वाघोबा मंदिरापासून समांतर मनोरकडे जाताना उजव्या बाजूस या जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह जोडणीचा पाईप जोडलेल्या ठिकाणी जीर्ण होऊन त्याला भेगा पडून, जलवाहिनीच्या उच्च दाबामुळे यातून पाणीगळती होऊन याठिकाणी पाण्याचे कारंजे बनल्याचे दिसते व रोज या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथून ये जा करणारेही हे पाणी वाया जात असल्याची खंत व्यक्त करतात.मासवण येथून आणलेले अशुद्ध पाणी या घाट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर शुद्ध पाणी पुरवणारी जलवाहिनी या केंद्राच्या थोड्या पुढे जाऊन तिथेही जलवाहिनीला छिद्रे पडली असून त्यातूनही पाणीगळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसते.ही जलवाहिनी फुटेपर्यंत नगरपरिषद वाट पाहत आहे का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. >दुर्घटना घडण्याची शक्यता बळावलीपाणी आणणारीं व नेणारी ही जलवाहिनीची योग्य ती चाचणी करून तिची देखभाल व दुरूस्ती करणे अपेक्षित असताना या गंभीर बाबीकडे नगरपरिषद एवढ्या मिहन्यांपासून पार दुर्लक्ष करीत आहे. तसेच एवढ्या उच्च दाबाच्या या जलवाहिनीस अशा गळतीमुळे फुटण्यास वेळही लागणार नाही. या दुर्लक्षित कारभारामुळे त्यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे नगरपरिषदेने लक्षात घेतलेले बरे.हि होणारी पाणी गळती व त्यातून रोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी याकडे नगरपरिषद यंत्रणेने गाम्भिर्याने लक्ष देऊन हि गळती थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत.जनतेला पाणी हेच जीवन व पाणी वाचवा असे पाणी बचतीचे धडे प्रशासनामार्फत देण्यात येतात,जनतेला धडे देणाऱ्या या यंत्रणेला पाणीबचतीचे महत्व कोणी शिकवावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.