शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

‘शताब्दी’ला गळती; रुग्णांना ‘ताप’!

By admin | Updated: July 31, 2016 01:41 IST

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे;

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे; त्या महापालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाला पावसाळ्यात गळती लागली आहे. या गळतीमुळे रुग्णांसह कर्मचारी वर्गाला अतोनात त्रास होत असून, महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. असे असतानाही रुग्णालयाची दुरुस्ती होत नसल्याने स्थानिकांसह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.पूर्व उपनगरातील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, शिवाजीनगर, देवनार आणि माहुल गाव या परिसरातून हजारो रुग्ण दररोज दाखल होत असतात. महत्त्वाचे म्हणजे या परिसरात महापालिकेचे शताब्दी हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. परिणामी रुग्णालयात सातत्याने वर्दळ असते. रुग्णालयाच्या परिसरात मोठी जागा असूनही रुग्णांना येथे योग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांसह नातेवाइकांनी केल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही शताब्दी रुग्णालयातील दुरवस्थेची दखल घेत सातत्याने महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन कोणत्याच तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. इमारतीची डागडुजी करण्यात येत नसल्याने आता पावसाळ्यात शताब्दीला गळती लागली आहे. इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी आत झिरपत असून, रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे गळतीची समस्या केवळ या वर्षीच समोर आलेली नाही तर मागील कित्येक वर्षांपासून या समस्येविरोधात आवाज उठवला जात आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याने समस्या सुटण्याऐवजी गुंता अधिकच वाढत चालला आहे. (प्रतिनिधी)>रेकॉर्ड पावसाच्या पाण्यात भिजलेज्या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईक थांबतात; तेथेही पावसाचे पाणी ठिबकत असल्याने त्रासात भरच पडत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने या समस्येबाबत पालिका प्रशासनासोबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. परंतु तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप अनावर झाला आहे.शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ठिबकते आहे. या कार्यालयात रुग्णालय प्रशासनाच्या अनेक नोंदवह्या, महत्त्वाची कागदपत्रे, कर्मचाऱ्यांचे रेकार्ड बुक यासारखी कागदपत्रे आहेत. आणि ती कागदपत्रे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत.