शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

‘शताब्दी’ला गळती; रुग्णांना ‘ताप’!

By admin | Updated: July 31, 2016 01:41 IST

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे;

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे; त्या महापालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाला पावसाळ्यात गळती लागली आहे. या गळतीमुळे रुग्णांसह कर्मचारी वर्गाला अतोनात त्रास होत असून, महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. असे असतानाही रुग्णालयाची दुरुस्ती होत नसल्याने स्थानिकांसह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.पूर्व उपनगरातील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, शिवाजीनगर, देवनार आणि माहुल गाव या परिसरातून हजारो रुग्ण दररोज दाखल होत असतात. महत्त्वाचे म्हणजे या परिसरात महापालिकेचे शताब्दी हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. परिणामी रुग्णालयात सातत्याने वर्दळ असते. रुग्णालयाच्या परिसरात मोठी जागा असूनही रुग्णांना येथे योग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांसह नातेवाइकांनी केल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही शताब्दी रुग्णालयातील दुरवस्थेची दखल घेत सातत्याने महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन कोणत्याच तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.मागील कित्येक वर्षांपासून शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. इमारतीची डागडुजी करण्यात येत नसल्याने आता पावसाळ्यात शताब्दीला गळती लागली आहे. इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी आत झिरपत असून, रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे गळतीची समस्या केवळ या वर्षीच समोर आलेली नाही तर मागील कित्येक वर्षांपासून या समस्येविरोधात आवाज उठवला जात आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याने समस्या सुटण्याऐवजी गुंता अधिकच वाढत चालला आहे. (प्रतिनिधी)>रेकॉर्ड पावसाच्या पाण्यात भिजलेज्या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईक थांबतात; तेथेही पावसाचे पाणी ठिबकत असल्याने त्रासात भरच पडत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने या समस्येबाबत पालिका प्रशासनासोबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. परंतु तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप अनावर झाला आहे.शताब्दी रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ठिबकते आहे. या कार्यालयात रुग्णालय प्रशासनाच्या अनेक नोंदवह्या, महत्त्वाची कागदपत्रे, कर्मचाऱ्यांचे रेकार्ड बुक यासारखी कागदपत्रे आहेत. आणि ती कागदपत्रे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत.