शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालेभाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 05:00 IST

मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक रोडावल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव चांगलेच कडाडले असून, भेंडी, गवार, हिरवी मिरची आणि घेवड्याच्या भावातदेखील मोठी वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक रोडावल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव चांगलेच कडाडले असून, भेंडी, गवार, हिरवी मिरची आणि घेवड्याच्या भावातदेखील मोठी वाढ झाली. गुरुवारी मार्केट यार्डात रविवारी २ लाख जुड्या कोथिंबिरीची आवक झाली होती. त्यात गुरुवारी ६४ हजार १८९ जुड्यापर्यंत घट झाली. मागणीच्या तुलनेत आवक अगदीच घटल्याने चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीच्या जुडीच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली. कोथिंबिरीला शेकडा ८०० ते २२०० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात एका जुडीचा भाव ३० ते ४० रुपये होता. मेथीचीदेखील केवळ ११ हजार जुड्या आवक झाल्याने त्याच्या भावात जुडीमागे २०० रुपयांनी वाढ झाली. मेथीचा शेकड्याचा भाव १ हजार ते १६०० रुपयांवर गेला होता. शेपूचे शेकड्याचे दर २०० ते सहाशे रुपयांनी वाढून, ते ८०० ते १६०० रुपयांवर पोहोचले होते. कांदापात शंभर जुडीमागे २०० ते ३०० आणि पालक १०० ते दोनशे रुपयांनी महागला. कांदापातीचा शेकडा दर एक हजार ते १८०० आणि पालकचा दर ५०० ते ८०० रुपये होता. किरकोळ बाजारात मेथीची गड्डी २० ते २५, पालक गड्डी २० रुपयांना विकली गेली.किरकोळ भाजीविक्रेते राजाभाऊ कासुर्डे म्हणाले, मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात तुरळक आवक झाल्याने पालेभाज्यांसह काही फळभाज्यादेखील महागल्या आहेत. भेंडीचा किलोमागे ७० ते ८०, गवार ७० ते ८०, हिरवी मिरची १०० ते १२०, दुधी भोपळा ४० ते ५०, फ्लॉवर ५० ते ६० आणि कोबीला ५० ते ६० रुपये भाव मिळाला. भेंडीची १२५ क्विंटल आवक झाली, त्याला दहा किलोमागे दीडशे ते साडेतीनशे रुपयांचा दर मिळाला. भेंडीच्या भावात किलोमागे ५ ते १0 रुपयांनी वाढ झाली आहे. गवारीची १०० क्विंटल आवक झाली. भावातही किलोमागे ५ रु. वाढले असून, त्याचा दहा किलोचा दर २०० ते ४५० रुपये होता. हिरव्या मिरचीची ७९६ क्विंटल आवक झाली असून, त्याच्या दरात किलोमागे तब्बल १० रुपयांनी वाढ झाली. त्यास दहा किलोमागे साडेतीनशे ते ५०० रुपये भाव मिळाला. दुधीभोपळा किलोमागे ५ रुपयांनी महागला असून, त्यास दहा किलोमागे १०० ते २०० रुपये भाव मिळाला.