शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हवाहवासा वाटणारा नेता!

By admin | Updated: June 4, 2014 01:03 IST

कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे.

राजेंद्र दर्डा
कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे. राजनबाबू, मी तर तुमच्या परिवाराचाच असं सांगून खांद्यावर हात टाकून जेव्हा ते काही बोलायचे तेव्हा खरोखरच ते माङया परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य झालेले असायचे. कोणी टीका करू देत अथवा काहीही म्हणू देत कधीही, कोणाला काय वाटेल याची फिकीर न करता बिनधास्त वागणारे ते लोकनेता होते. 
आमच्याच मराठवाडय़ाचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्या दोघांची भाषणांमधील जुगलबंदी असो किंवा खाजगी मैफिलीत रंगणा:या कोटय़ा असोत, ते दोघे सगळी मैफील, सभा ताब्यात घ्यायचे. विधानसभेत देखील भाषणाला उभे राहिले की अनेकांचे कान त्यांच्याकडे असायचे. सभागृह स्वत:च्या भाषणाने ते असे काही ताब्यात घ्यायचे की सगळ्यांना ते बोलत राहावे, असे वाटत असे. बोलताना ते टोप्या उडवायचे, चिमटे काढायचे, पण कधी कोणाला जखमी करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. तरीही ते स्वत:चा मुद्दा मात्र काही केल्या सोडायचे नाहीत. 
ग्रामीण महाराष्ट्र त्यांना तळहातावरच्या रेषेइतका स्पष्ट माहिती होता. इथले नेते, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे दोष लख्ख माहिती असलेला हा नेता असा अचानक धक्का देऊन सगळ्यांना सोडून जाईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ‘तुम्ही चांगलं काम करताय’ असे सांगणारे दिलदार गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने माझी व्यक्तिगत देखील मोठी हानी झाली आहे. ज्या विधानसभेने त्यांची घणाघाती भाषणो ऐकली तेच सभागृह आज असे शोकसंतप्त झालेले पाहून माङयाही भावना दाटून आल्या. 
मागच्या पावसाळी अधिवेशनाचे दिवस होते. मी माङया दालनात शिक्षण विभागाचे काही अधिकारी, आमदार यांच्यासोबत चर्चा करीत बसलो होतो. चर्चा सुरूअसताना अचानक दरवाजा उघडून ‘काय म्हणताय राजनबाबू..’ असे म्हणत गोपीनाथ मुंडे आत आले. ‘साहेब, आपण..’ असे म्हणत मी त्यांचे स्वागत केले. मला म्हणाले, ‘हा माङया मतदारसंघातला माणूस आहे. त्याचं काम आहे तुमच्या शिक्षण विभागात.. काम झालंच पाहिजे..’ आणि मग काही वेळ त्यांनी गप्पाही मारल्या. कोठेही  मोठेपणाचा आव नाही, पण त्याचवेळी   सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्यासाठी, मतदारसंघातल्या छोटय़ा माणसासाठी ते माङयार्पयत आले. वास्तविक ते फोनही करू शकले असते. या त्यांच्या अशा स्वभावामुळेच ते जनमानसात लोकनेता म्हणून नावलौकिक मिळवू शकले. अशा या नेत्यास मी माङया, मतदारसंघाच्या आणि परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. 
(लेखक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत़)