शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

हवाहवासा वाटणारा नेता!

By admin | Updated: June 4, 2014 01:03 IST

कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे.

राजेंद्र दर्डा
कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे. राजनबाबू, मी तर तुमच्या परिवाराचाच असं सांगून खांद्यावर हात टाकून जेव्हा ते काही बोलायचे तेव्हा खरोखरच ते माङया परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य झालेले असायचे. कोणी टीका करू देत अथवा काहीही म्हणू देत कधीही, कोणाला काय वाटेल याची फिकीर न करता बिनधास्त वागणारे ते लोकनेता होते. 
आमच्याच मराठवाडय़ाचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्या दोघांची भाषणांमधील जुगलबंदी असो किंवा खाजगी मैफिलीत रंगणा:या कोटय़ा असोत, ते दोघे सगळी मैफील, सभा ताब्यात घ्यायचे. विधानसभेत देखील भाषणाला उभे राहिले की अनेकांचे कान त्यांच्याकडे असायचे. सभागृह स्वत:च्या भाषणाने ते असे काही ताब्यात घ्यायचे की सगळ्यांना ते बोलत राहावे, असे वाटत असे. बोलताना ते टोप्या उडवायचे, चिमटे काढायचे, पण कधी कोणाला जखमी करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. तरीही ते स्वत:चा मुद्दा मात्र काही केल्या सोडायचे नाहीत. 
ग्रामीण महाराष्ट्र त्यांना तळहातावरच्या रेषेइतका स्पष्ट माहिती होता. इथले नेते, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे दोष लख्ख माहिती असलेला हा नेता असा अचानक धक्का देऊन सगळ्यांना सोडून जाईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ‘तुम्ही चांगलं काम करताय’ असे सांगणारे दिलदार गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने माझी व्यक्तिगत देखील मोठी हानी झाली आहे. ज्या विधानसभेने त्यांची घणाघाती भाषणो ऐकली तेच सभागृह आज असे शोकसंतप्त झालेले पाहून माङयाही भावना दाटून आल्या. 
मागच्या पावसाळी अधिवेशनाचे दिवस होते. मी माङया दालनात शिक्षण विभागाचे काही अधिकारी, आमदार यांच्यासोबत चर्चा करीत बसलो होतो. चर्चा सुरूअसताना अचानक दरवाजा उघडून ‘काय म्हणताय राजनबाबू..’ असे म्हणत गोपीनाथ मुंडे आत आले. ‘साहेब, आपण..’ असे म्हणत मी त्यांचे स्वागत केले. मला म्हणाले, ‘हा माङया मतदारसंघातला माणूस आहे. त्याचं काम आहे तुमच्या शिक्षण विभागात.. काम झालंच पाहिजे..’ आणि मग काही वेळ त्यांनी गप्पाही मारल्या. कोठेही  मोठेपणाचा आव नाही, पण त्याचवेळी   सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्यासाठी, मतदारसंघातल्या छोटय़ा माणसासाठी ते माङयार्पयत आले. वास्तविक ते फोनही करू शकले असते. या त्यांच्या अशा स्वभावामुळेच ते जनमानसात लोकनेता म्हणून नावलौकिक मिळवू शकले. अशा या नेत्यास मी माङया, मतदारसंघाच्या आणि परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. 
(लेखक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत़)