शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

हवाहवासा वाटणारा नेता!

By admin | Updated: June 4, 2014 01:03 IST

कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे.

राजेंद्र दर्डा
कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे. राजनबाबू, मी तर तुमच्या परिवाराचाच असं सांगून खांद्यावर हात टाकून जेव्हा ते काही बोलायचे तेव्हा खरोखरच ते माङया परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य झालेले असायचे. कोणी टीका करू देत अथवा काहीही म्हणू देत कधीही, कोणाला काय वाटेल याची फिकीर न करता बिनधास्त वागणारे ते लोकनेता होते. 
आमच्याच मराठवाडय़ाचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्या दोघांची भाषणांमधील जुगलबंदी असो किंवा खाजगी मैफिलीत रंगणा:या कोटय़ा असोत, ते दोघे सगळी मैफील, सभा ताब्यात घ्यायचे. विधानसभेत देखील भाषणाला उभे राहिले की अनेकांचे कान त्यांच्याकडे असायचे. सभागृह स्वत:च्या भाषणाने ते असे काही ताब्यात घ्यायचे की सगळ्यांना ते बोलत राहावे, असे वाटत असे. बोलताना ते टोप्या उडवायचे, चिमटे काढायचे, पण कधी कोणाला जखमी करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. तरीही ते स्वत:चा मुद्दा मात्र काही केल्या सोडायचे नाहीत. 
ग्रामीण महाराष्ट्र त्यांना तळहातावरच्या रेषेइतका स्पष्ट माहिती होता. इथले नेते, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे दोष लख्ख माहिती असलेला हा नेता असा अचानक धक्का देऊन सगळ्यांना सोडून जाईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ‘तुम्ही चांगलं काम करताय’ असे सांगणारे दिलदार गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने माझी व्यक्तिगत देखील मोठी हानी झाली आहे. ज्या विधानसभेने त्यांची घणाघाती भाषणो ऐकली तेच सभागृह आज असे शोकसंतप्त झालेले पाहून माङयाही भावना दाटून आल्या. 
मागच्या पावसाळी अधिवेशनाचे दिवस होते. मी माङया दालनात शिक्षण विभागाचे काही अधिकारी, आमदार यांच्यासोबत चर्चा करीत बसलो होतो. चर्चा सुरूअसताना अचानक दरवाजा उघडून ‘काय म्हणताय राजनबाबू..’ असे म्हणत गोपीनाथ मुंडे आत आले. ‘साहेब, आपण..’ असे म्हणत मी त्यांचे स्वागत केले. मला म्हणाले, ‘हा माङया मतदारसंघातला माणूस आहे. त्याचं काम आहे तुमच्या शिक्षण विभागात.. काम झालंच पाहिजे..’ आणि मग काही वेळ त्यांनी गप्पाही मारल्या. कोठेही  मोठेपणाचा आव नाही, पण त्याचवेळी   सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्यासाठी, मतदारसंघातल्या छोटय़ा माणसासाठी ते माङयार्पयत आले. वास्तविक ते फोनही करू शकले असते. या त्यांच्या अशा स्वभावामुळेच ते जनमानसात लोकनेता म्हणून नावलौकिक मिळवू शकले. अशा या नेत्यास मी माङया, मतदारसंघाच्या आणि परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. 
(लेखक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत़)