शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्व आता नाशिककडे!

By admin | Updated: June 4, 2017 00:36 IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुंबईत संप मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी नाशिकमधील बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुंबईत संप मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी नाशिकमधील बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाट्याच्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. प्रशासनाने संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक जिल्ह्यातून बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे. नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे यांच्याशी चर्चा न करता शेतकऱ्यांनी त्यांना माघारी पाठविले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समित्यांची कार्यालये सुरू असली तरी, व्यवहार मात्र झाले नाहीत. कळवणला पोलीस बंदोबस्तात शेतमाल पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असता तेथील व्यापाऱ्यांनी असहकार दर्शविला. पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठामपुणतांबा (जि. अहमदनगर) : मुंबईत परस्पर संप मागे घेण्याचा निर्णय घेऊन किसान क्रांती समितीच्या सुकाणू समितीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करीत शनिवारी पुणतांबा ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत समितीचा धिक्कार केला. शेतकऱ्याचा सातबारा कोरा न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. किसान क्रांतीचा संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे, असे शनिवारी अभय चव्हाण, प्रमोद चौधरी, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, अरूण बोरबणे, विठ्ठल शेळके, प्रशांत काळवाघे आदींनी म्हटले आहे.किसान सभेची नाराजी; नवले बाहेर पडलेमुंबई : मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संप मागे घेण्यास आपली सहमती नसल्याचे सांगत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले हे रात्री ३ च्या सुमारास ‘वर्षा’वरून बाहेर पडले. चर्चेला सुरुवात होताना ते अन्य शेतकरी नेत्यांसोबत होते.सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा ही संपाची मागणी होती. या दोन्ही मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुधाच्या भाववाढीचे गाजरही बेभरवशाचे आहे. असे असताना संप मागे घेऊ नका असे आपण वारंवार शिष्टमंडळातील सदस्यांना सांगत होतो, असे नवले यांनी सांगितले.