शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जवाहरलाल दर्डा विकासाची जाण असणारे नेते

By admin | Updated: December 25, 2015 03:43 IST

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते.

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते. ते काम मी केले होते. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व आम्ही मान्य केले होते. आणीबाणीला आधी पाठिंबा दिला होता. ही आमची आयुष्यातील चूक आहे. हे आम्ही कबूल केले. त्या कालखंडामध्ये इंदिराजींच्या विरोधात उभा राहिलो होतो. हे जवाहरलाल दर्डांना आवडले नाही. त्यांच्या निष्ठा इंदिरांच्या बाबतीत अबाधित होत्या. त्यांच्या काँग्रेसच्या संकल्पनेच्या ज्या भूमिका होत्या, त्या अतिशय वेगळ्या होत्या. वैयक्तिक मतभेद नव्हते; पण इंदिरा गांधी या विषयासंबंधी तडजोड करायची नाही, ही त्यांची भूमिका होती. एखाद्याची श्रद्धा असावी आणि त्याच्याशी तुम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्यांची गांधी कुटुंबीयांबाबत श्रद्धा होती. राज्याच्या विकासात मंत्रिमंडळात आम्ही एकत्रित काम केले आहे. विद्युतनिर्मिती हा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. त्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक करण्यासाठी बाबूजींचा आग्रह होता. माझ्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी विद्युतनिर्मितीसाठी एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त निधी देण्यास विरोध केला हे त्यांना पटत नव्हते. या प्रश्नावरून थोडी कुरबुर व्हायची; पण माझ्या दृष्टीने उद्या या राज्याचा विकास कसा होईल, याची जाण असलेले जे सहकारी होते, त्यांत जवाहरलाल दर्डा होते. ही भूमिका मांडण्याबाबतीत ते कधीही मागेपुढे पाहत नसत. विकासामध्ये राजकारण आणता उपयोगाचे नाही. सातारा किंवा पुणे जिल्ह्यात विकासाच्या कामात कोणी आडवे येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून पाणी खेळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरडोई शेती तीन एकरांच्या आत आहे. विदर्भात हे प्रमाण १४ ते १५ एकरांच्या आसपास आहे. कमी जमीन असली, की प्रपंचासाठी माणूस जास्त धडपड करतो. विदर्भात जमीन जास्त आहे. पूर्वी पाऊस चांगला व्हायचा. ज्वारी चांगली व्हायची. माणूस दिलदार आहे. आप्तांना मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती आहे. कर्जाचा बोजा किती वाढला, हे पाहण्याची प्रवृत्ती नाही, ही स्थिती आहे.