शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा विकासाची जाण असणारे नेते

By admin | Updated: December 25, 2015 03:43 IST

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते.

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते. ते काम मी केले होते. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व आम्ही मान्य केले होते. आणीबाणीला आधी पाठिंबा दिला होता. ही आमची आयुष्यातील चूक आहे. हे आम्ही कबूल केले. त्या कालखंडामध्ये इंदिराजींच्या विरोधात उभा राहिलो होतो. हे जवाहरलाल दर्डांना आवडले नाही. त्यांच्या निष्ठा इंदिरांच्या बाबतीत अबाधित होत्या. त्यांच्या काँग्रेसच्या संकल्पनेच्या ज्या भूमिका होत्या, त्या अतिशय वेगळ्या होत्या. वैयक्तिक मतभेद नव्हते; पण इंदिरा गांधी या विषयासंबंधी तडजोड करायची नाही, ही त्यांची भूमिका होती. एखाद्याची श्रद्धा असावी आणि त्याच्याशी तुम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्यांची गांधी कुटुंबीयांबाबत श्रद्धा होती. राज्याच्या विकासात मंत्रिमंडळात आम्ही एकत्रित काम केले आहे. विद्युतनिर्मिती हा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. त्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक करण्यासाठी बाबूजींचा आग्रह होता. माझ्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी विद्युतनिर्मितीसाठी एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त निधी देण्यास विरोध केला हे त्यांना पटत नव्हते. या प्रश्नावरून थोडी कुरबुर व्हायची; पण माझ्या दृष्टीने उद्या या राज्याचा विकास कसा होईल, याची जाण असलेले जे सहकारी होते, त्यांत जवाहरलाल दर्डा होते. ही भूमिका मांडण्याबाबतीत ते कधीही मागेपुढे पाहत नसत. विकासामध्ये राजकारण आणता उपयोगाचे नाही. सातारा किंवा पुणे जिल्ह्यात विकासाच्या कामात कोणी आडवे येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून पाणी खेळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरडोई शेती तीन एकरांच्या आत आहे. विदर्भात हे प्रमाण १४ ते १५ एकरांच्या आसपास आहे. कमी जमीन असली, की प्रपंचासाठी माणूस जास्त धडपड करतो. विदर्भात जमीन जास्त आहे. पूर्वी पाऊस चांगला व्हायचा. ज्वारी चांगली व्हायची. माणूस दिलदार आहे. आप्तांना मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती आहे. कर्जाचा बोजा किती वाढला, हे पाहण्याची प्रवृत्ती नाही, ही स्थिती आहे.