शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

जवाहरलाल दर्डा विकासाची जाण असणारे नेते

By admin | Updated: December 25, 2015 03:43 IST

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते.

माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते. ते काम मी केले होते. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व आम्ही मान्य केले होते. आणीबाणीला आधी पाठिंबा दिला होता. ही आमची आयुष्यातील चूक आहे. हे आम्ही कबूल केले. त्या कालखंडामध्ये इंदिराजींच्या विरोधात उभा राहिलो होतो. हे जवाहरलाल दर्डांना आवडले नाही. त्यांच्या निष्ठा इंदिरांच्या बाबतीत अबाधित होत्या. त्यांच्या काँग्रेसच्या संकल्पनेच्या ज्या भूमिका होत्या, त्या अतिशय वेगळ्या होत्या. वैयक्तिक मतभेद नव्हते; पण इंदिरा गांधी या विषयासंबंधी तडजोड करायची नाही, ही त्यांची भूमिका होती. एखाद्याची श्रद्धा असावी आणि त्याच्याशी तुम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्यांची गांधी कुटुंबीयांबाबत श्रद्धा होती. राज्याच्या विकासात मंत्रिमंडळात आम्ही एकत्रित काम केले आहे. विद्युतनिर्मिती हा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. त्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक करण्यासाठी बाबूजींचा आग्रह होता. माझ्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी विद्युतनिर्मितीसाठी एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त निधी देण्यास विरोध केला हे त्यांना पटत नव्हते. या प्रश्नावरून थोडी कुरबुर व्हायची; पण माझ्या दृष्टीने उद्या या राज्याचा विकास कसा होईल, याची जाण असलेले जे सहकारी होते, त्यांत जवाहरलाल दर्डा होते. ही भूमिका मांडण्याबाबतीत ते कधीही मागेपुढे पाहत नसत. विकासामध्ये राजकारण आणता उपयोगाचे नाही. सातारा किंवा पुणे जिल्ह्यात विकासाच्या कामात कोणी आडवे येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून पाणी खेळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरडोई शेती तीन एकरांच्या आत आहे. विदर्भात हे प्रमाण १४ ते १५ एकरांच्या आसपास आहे. कमी जमीन असली, की प्रपंचासाठी माणूस जास्त धडपड करतो. विदर्भात जमीन जास्त आहे. पूर्वी पाऊस चांगला व्हायचा. ज्वारी चांगली व्हायची. माणूस दिलदार आहे. आप्तांना मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती आहे. कर्जाचा बोजा किती वाढला, हे पाहण्याची प्रवृत्ती नाही, ही स्थिती आहे.