शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

आघाडीचा तिढा दोन दिवसांत सुटणार

By admin | Updated: September 20, 2014 03:23 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा गुंता दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याला तत्त्वत: सहमती दर्शविली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ठरले : चिघळलेला वाद आणखी ताणायचा नाही, तुटू तर द्यायचेच नाही
नवीन सिन्हा - नवी दिल्ली
काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा गुंता दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याला तत्त्वत: सहमती दर्शविली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रादेशिक नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा केल्याने चिघळलेला वाद आणखी ताणायचा नाही आणि तुटू तर द्यायचेच नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी ठरविले आहे.
शनिवारपासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे जागांच्या संख्येचा वाद संपुष्टात आणण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र 
लढण्याचे मान्य केल्याने जागांच्या वाटाघाटीला वेग दिला जाईल. महाराष्ट्रात मोठे आव्हान उभे ठाकल्याची दोन्ही पक्षांना जाणीव आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अॅण्टोनी यांनी सांगितले. 
अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होणार असून, त्यात वाद निकाली काढले जातील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांसोबत राज्य पातळीवर नव्याने चर्चा चालविली आहे.
 
च्उपमुख्यमंत्री अजित पवार 144-144 या सूत्रवर ठाम होते. अलीकडेच पोटनिवडणुकीत भाजपाला हादरा बसल्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा महायुतीला आव्हान दिले जाऊ शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते.
च्गेल्या वेळी राष्ट्रवादीने 114 तर काँग्रेसने 174 जागा लढविल्या होत्या. या वेळी सहा ते सात जागा जास्त देऊन  काँग्रेस या पक्षाचे समाधान करू शकतो, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुख्य तिढा मुंबईतील जागांचा आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला गेल्या वेळेपेक्षा किमान 7 जागा जास्त हव्या आहेत. 
 
मौलाना मुफ्ती राष्ट्रवादीत
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी व शहर विकास आघाडीचे सुनील गायकवाड यांनी चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.