शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शिवाजी विद्यापीठाची निकालात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:58 IST

राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत.

- संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत. कुलपतींनी आतापर्यंत दोन वेळा प्रशस्तिपत्र देऊन गौरविलेही आहे.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत होत नाहीत, त्या विद्यापीठाच्या १२ लाख प्रश्र्नपत्रिका आठ दिवसांत तपासण्याचे अवघड आव्हान विद्यापीठासमोर आहे. कुलपतींनी या विद्यापीठाला विलंबाबध्दल फटकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीची माहिती घेतली असता हे चित्र समोर आले.प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. सत्र पद्धतीमुळे परीक्षाविषयक कामाचा भार वाढला आहे. त्यातून ३० ते ४५ दिवसांत निकाल लावण्यासाठी विद्यापीठाने गेल्या दहा वर्षांत महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. यात ८० दिवसांचा परीक्षांचा कालावधी ४२ दिवसांवर आणला. परीक्षापूर्व आणि नंतरच्या विविध स्वरूपांतील कामांसाठी ‘डिजिटल युनिव्हर्सिर्टी- डिजिटल कॉलेज’ कक्ष, सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी, आदी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आहे.४५ दिवसांत ९० टक्के निकालया वर्षीच्या उन्हाळी सत्रात विद्यापीठाने ६०० परीक्षा घेतल्या. त्यातील ३५४ परीक्षांचे निकाल जूनअखेर जाहीर झाले. गुरुवारअखेर ५०२ परीक्षांचे निकाल लागले आहेत. यातील ९० टक्के परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर केल्याचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी सांगितले.