शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

शिवाजी विद्यापीठाची निकालात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:58 IST

राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत.

- संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत. कुलपतींनी आतापर्यंत दोन वेळा प्रशस्तिपत्र देऊन गौरविलेही आहे.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत होत नाहीत, त्या विद्यापीठाच्या १२ लाख प्रश्र्नपत्रिका आठ दिवसांत तपासण्याचे अवघड आव्हान विद्यापीठासमोर आहे. कुलपतींनी या विद्यापीठाला विलंबाबध्दल फटकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीची माहिती घेतली असता हे चित्र समोर आले.प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. सत्र पद्धतीमुळे परीक्षाविषयक कामाचा भार वाढला आहे. त्यातून ३० ते ४५ दिवसांत निकाल लावण्यासाठी विद्यापीठाने गेल्या दहा वर्षांत महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. यात ८० दिवसांचा परीक्षांचा कालावधी ४२ दिवसांवर आणला. परीक्षापूर्व आणि नंतरच्या विविध स्वरूपांतील कामांसाठी ‘डिजिटल युनिव्हर्सिर्टी- डिजिटल कॉलेज’ कक्ष, सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी, आदी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आहे.४५ दिवसांत ९० टक्के निकालया वर्षीच्या उन्हाळी सत्रात विद्यापीठाने ६०० परीक्षा घेतल्या. त्यातील ३५४ परीक्षांचे निकाल जूनअखेर जाहीर झाले. गुरुवारअखेर ५०२ परीक्षांचे निकाल लागले आहेत. यातील ९० टक्के परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर केल्याचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी सांगितले.