शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

एलबीटीचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात

By admin | Updated: June 10, 2014 23:20 IST

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे.

पुणे : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. या निर्णया विरोधात महापालिकाही आक्रमक झाल्याने राज्यशासनाची कोंडी झाली असून आता या बाबतचा निर्णय महापालिकांनीच आपल्या स्तरावर व्यापा-यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत राज्यशासनास कळावावा असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे एलबीटीचा निर्णय आता महापालिकांनाच घ्यावा लागणार असून त्यामुळे व्यापारी आणि महापालिकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यशासनाच्या गेल्या काही दिवसांपासून मँराथॉन बैठका सुरू आहेत. एलबीटीला पर्याय म्हणून पुन्हा जकात लागू करणे, व्हँट अथवा सेल टँक्सवर सर चार्च लावून महापालिकांना अनुदान देणे हे पर्याय राज्यशासनाने पुढे केले आहेत. मात्र, राज्यशासनाच्या या निर्णया विरोधात राज्यातील प्रमुख महापालिकांच्या पदाधिका-यांनी तसेच कर्मचा-यांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे महापालिकांचे महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई येथे बोलविली होती. या बैठकीस राज्यातील 25 महापालिकांचे महापौर आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते. यावेळी जवळपास सर्वच महापालिकांनी पालिकांचे असतित्व राज्यशासनाने धोक्यात आणू नये तसेच प्रत्येक महापालिकेस आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. तर काही महापालिकांनी एलबीटी रद्द करून पुन्हा जकात सुरू करण्याची मागणी केली असल्याचे पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढील दोन दिवसात बैठकीस उपस्थित असलेल्या महापौरांनी, महापालिका आयुक्तांसह शहरातील व्यापा-यांची बैठक घेऊन आपला निर्णय राज्यशासनास कळवावा अशा सूचना मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, येत्या दोन दिवसात ही बैठक घेऊन राज्यशासनास निर्णय कळविण्यात येणार असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले.मोठया महापालिकांना हवा एलबीटीच !जकातीच्या तुलनेत एलबीटीमुळे पालिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली असून तो रद्द करू नये अशी मागणी पुणे , ठाणे, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबई या मोठया महापालिकांच्या महापौरांनी या बैठकीत केली. तर इतर सर्व लहान महापालिकांनी शासनाने एलबीटी आणि जकात दोन्हीही रद्द करून शासनाने पालिकेस अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.