शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

एलबीटीचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात

By admin | Updated: June 10, 2014 23:20 IST

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे.

पुणे : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. या निर्णया विरोधात महापालिकाही आक्रमक झाल्याने राज्यशासनाची कोंडी झाली असून आता या बाबतचा निर्णय महापालिकांनीच आपल्या स्तरावर व्यापा-यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत राज्यशासनास कळावावा असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे एलबीटीचा निर्णय आता महापालिकांनाच घ्यावा लागणार असून त्यामुळे व्यापारी आणि महापालिकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यशासनाच्या गेल्या काही दिवसांपासून मँराथॉन बैठका सुरू आहेत. एलबीटीला पर्याय म्हणून पुन्हा जकात लागू करणे, व्हँट अथवा सेल टँक्सवर सर चार्च लावून महापालिकांना अनुदान देणे हे पर्याय राज्यशासनाने पुढे केले आहेत. मात्र, राज्यशासनाच्या या निर्णया विरोधात राज्यातील प्रमुख महापालिकांच्या पदाधिका-यांनी तसेच कर्मचा-यांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे महापालिकांचे महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई येथे बोलविली होती. या बैठकीस राज्यातील 25 महापालिकांचे महापौर आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते. यावेळी जवळपास सर्वच महापालिकांनी पालिकांचे असतित्व राज्यशासनाने धोक्यात आणू नये तसेच प्रत्येक महापालिकेस आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. तर काही महापालिकांनी एलबीटी रद्द करून पुन्हा जकात सुरू करण्याची मागणी केली असल्याचे पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढील दोन दिवसात बैठकीस उपस्थित असलेल्या महापौरांनी, महापालिका आयुक्तांसह शहरातील व्यापा-यांची बैठक घेऊन आपला निर्णय राज्यशासनास कळवावा अशा सूचना मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, येत्या दोन दिवसात ही बैठक घेऊन राज्यशासनास निर्णय कळविण्यात येणार असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले.मोठया महापालिकांना हवा एलबीटीच !जकातीच्या तुलनेत एलबीटीमुळे पालिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली असून तो रद्द करू नये अशी मागणी पुणे , ठाणे, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबई या मोठया महापालिकांच्या महापौरांनी या बैठकीत केली. तर इतर सर्व लहान महापालिकांनी शासनाने एलबीटी आणि जकात दोन्हीही रद्द करून शासनाने पालिकेस अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.