शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

नरेंद्र मोदींच्या ‘ज्योतिपुंज’मध्ये लक्ष्मणराव इनामदारांचा उल्लेख

By admin | Updated: April 14, 2017 23:25 IST

खटावकरांचा गौरव : गुजरातमधील संघाच्या स्थापनेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा

नम्रता भोसले --खटाव  --पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात त्यांचे खटावचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्याबद्दल उल्लेख केला आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हा अन् खटावचा अप्रत्यक्षपणे सन्मानच झाला आहे, अशी भावना खटाव ग्रामस्थांची झाली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरून पोस्ट फिरवली जात आहे. गुजरातमध्ये ‘वकीलसाहेब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत लक्ष्मणराव माधवराव इनामदार यांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये झाला. त्यांचे पूर्वज श्रीकृष्णराव खटावकरांनी शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी सेवा केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूजी महाराज यांनी त्यांना इनाम म्हणून जमीन आणि ‘सरदार’ ही उपाधी दिली होती. त्यावेळेपासून या परिवाराला ‘इनामदार’ नावाने ओळखले जाऊ लागले. लक्ष्मणराव कदम यांचे कुटुंब मोठे होते. कुटुंबात सात भाऊ, दोन बहिणी आणि चार विधवा आत्या तसेच त्यांची मुले असे मोठे एकत्र कुटुंब. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची याही परिस्थितीत वडील आणि आजोबांनी कुटुंबाला एकत्र राहण्याची ताकद दिली. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरही त्यांचे संस्कार रुजले होते. त्यांचे शिक्षण खटाव तसेच सातारा येथे झाले. १९३९ मध्ये साताऱ्यामध्ये विधी शाखेतून शिक्षण घेत असताना हैद्राबाद निजामच्या विरुद्धचे आंदोलन जोरात सुरू होते. त्यावेळी लक्ष्मणरावांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून समवेत दीडशे महाविद्यालयीन मुलांना बरोबर घेऊन या आंदोलनात भाग घेतला. १९४३ मध्ये प्रचारक म्हणून गुजरातमधील नवसारी गावात पाठवण्यात आले. १९५२ मध्ये ते गुजरात प्रांताचे मुख्य प्रचारक बनले. आणि त्याच्याच प्रयत्नातून पुढील चार वर्षांत त्यांनी दीडशे शाखा स्थापन केल्या. आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्याकडे असलेली कला तसेच लहान-लहान कार्यकर्त्यांची काळजी घेत असताना प्रकृती निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जोड असावी यादृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा. संघाचे कार्य करताना कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार नाही, याविषयी विशेष लक्ष असायचे. स्वयंसेवकांची जपणूक तसेच त्याचे मन व त्याच्या संस्काराची जपणूक करण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. संघाचे मुख्य प्रचारक म्हणून कार्यरत असताना गुजरातमध्ये पडणारा दुष्काळ, पूर, भूकंप, मीनाक्षीपुरम कांड या आपत्ती काळात त्यांनी हिंमतीने सामना केला. गुजरातमध्ये संघ कार्याचे शिल्पकार लक्ष्मणराव इनामदार यांचा मृत्यू १५ जुलै १९८५ मध्ये पुणे येथे झाला. गुजरातमध्ये केवळ संघच नाही तर संघ कार्याने पे्ररित होऊन केलेल्या कार्याच्या खुणा तसेच विचारांचा प्रभाव दिसून येतो.गुजरातमध्ये संघाचे काम करत असताना गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या समवेत नरेंद्र मोदी.