शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या खटल्यात वकिलाची नेमणूक आता सरकारमार्फतच

By admin | Updated: April 10, 2017 04:19 IST

महत्त्वाच्या व गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी अनुभव व तज्ज्ञ विशेष सरकारी वकील नेमण्याचे

जमीर काझी / मुंबईमहत्त्वाच्या व गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी अनुभव व तज्ज्ञ विशेष सरकारी वकील नेमण्याचे पोलीस आयुक्त, विशेष महानिरीक्षक व अधीक्षकांच्या अधिकारावर आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या नेमणुका आता गृहविभागाकडून होणार असून, पोलीस घटकप्रमुखांना त्याबाबतचा प्रस्ताव शासनकडे सादर करावा लागणार आहे. खासगी वकिलाच्या नियुक्ती पद्धतीतील त्रुटी आणि त्याबाबत येणाऱ्या आक्षेपांमुळे घटकप्रमुखांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत, असे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महिला, दलित अत्याचार किंवा बालकाचे अपहरण व हत्या यासारख्या गंभीर घटना घडल्यास, त्याचे तीव्र पडसाद स्थानिक स्तरावर उमटत असतात. काही वेळा त्याचे लोण राज्यभरात पसरून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गुन्ह्यांतील आरोपींना सत्र न्यायालयात जास्त शिक्षा होऊन योग्य धडा मिळावा, यासाठी तज्ज्ञ व अनुभवी खासगी वकिलांची नेमणूक करण्याची घोषणा राज्यकर्त्यांकडून केली जाते. त्यांच्या नियुक्तीचे अधिकार संबंंधित घटकातील पोलीस आयुक्त, विशेष महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांना राज्य सरकाने एका निर्णयाद्वारे दिलेले आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शन तत्त्वे घालून देण्यात आलेली होती. या वकिलांना खटल्याचे काम पाहण्यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे आवश्यक तितके मानधन सुनावणीच्या स्वरूपात दिले जाते. मात्र, काही खटल्यामध्ये नेमण्यात आलेल्या खासगी वकिलांबाबत आक्षेप, तसेच त्यांच्या नियुक्तीच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता गृहविभागाकडून घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार, संबंधित घटकप्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव बनवावयाचे आहेत. त्यासाठी संबंधित उमेदवाराकडे वकिलाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. खासगी तज्ज्ञ वकील नेमणुकीबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविल्यानंतर, त्यांच्याकडून तो मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला जाईल, तसेच आयुक्तालय व जिल्हा स्तरावर विशेष सरकारी अभियोक्ताचे पॅनेल नियुक्तीचा प्रस्ताव घटकप्रमुखांनी थेट विधी व न्याय विभागाकडे परवानगीसाठी पाठवावयाचा आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पॅनेलच्या नियुक्तीवर शिक्कामोर्र्तब होणार आहे.अपयशामुळे राज्य सरकार घेणार निर्णयसरकार पक्षातर्फे खासगी वकिलाची नियुक्ती करताना, काही घटकांतील पोलीस प्रमुुखांकडून ठरावीक विधीतज्ज्ञांची निवड केली जाते. त्यांच्याहून पात्र असलेले अनेक इच्छुक उमेदवार असूनही, ठरावीक वकिलाला प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी गृहविभागाकडे आल्या आहेत.चुकीच्या नियुक्तीमुळे अनेक वेळा खटल्यात सरकारपक्षाला आपल्या बाजूने निकाल लावण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीचा निर्णय राज्य सरकाकडून घेण्यात येत आहे. ...तर परिस्थितीनुसार घेणार निर्णयखासगी विशेष वकिलाची नियुक्ती ही केवळ सत्र न्यायालयातील खटल्यासाठी असणार आहे. जर हा खटला त्यानंतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्यास, त्या वेळी परिस्थितीनुसार अन्य वकिलाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.