शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

हिंदू सणांनाच कायदे आडवे येतात

By admin | Updated: July 6, 2017 04:45 IST

सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले. मंत्रालयासमोरील क ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसापाठोपाठ हिंदूंचे सण मग गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो की दिवाळी वातावरण तापू लागते. रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. कायदे आडवे येतात, अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. गणेशोत्सवावर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे त्यांनी बजावले. गणेशोत्सव साजरे करणारे अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. ते चुकत असतील तर त्यांना समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले.शेतकरी संवाद ९ पासूनमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुुंबईतील शेतकऱ्यांची नावे आहेत. हे जरी ऐकायला विचित्र असलं तरी खातरजमा करायला काय हरकत आहे. त्याचवेळी सातबारा कोरा झालेले ४० लाख शेतकरी आणि कर्जमाफी योजनेचा लाभ झालेल्या अन्य ४९ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान उद्धव यांनी सरकारला दिले.भाजपाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता असल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘शेवटी ते ठरवतील तो वाल्या आणि ते ठरवतील तो वाल्मीकी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.थेट सरपंच निवडीस विरोधनगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला. मग उद्या मुख्यमंत्रीपण थेट जनतेतून निवडणार काय? कोणताही निर्णय घेताना आधीच्या निर्णयाचा आढावा घ्यायला हवा. सरपंच वा नगराध्यक्ष वेगळ्या विचारांचा निवडून आला की त्या ठिकाणी मतभेद होतात. त्याचा दुष्परिणाम शेवटी त्या-त्या पक्षाला भोगावे लागतात. तेव्हा सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.