शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

हिंदू सणांनाच कायदे आडवे येतात

By admin | Updated: July 6, 2017 04:45 IST

सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले. मंत्रालयासमोरील क ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसापाठोपाठ हिंदूंचे सण मग गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो की दिवाळी वातावरण तापू लागते. रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. कायदे आडवे येतात, अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. गणेशोत्सवावर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे त्यांनी बजावले. गणेशोत्सव साजरे करणारे अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. ते चुकत असतील तर त्यांना समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले.शेतकरी संवाद ९ पासूनमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुुंबईतील शेतकऱ्यांची नावे आहेत. हे जरी ऐकायला विचित्र असलं तरी खातरजमा करायला काय हरकत आहे. त्याचवेळी सातबारा कोरा झालेले ४० लाख शेतकरी आणि कर्जमाफी योजनेचा लाभ झालेल्या अन्य ४९ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान उद्धव यांनी सरकारला दिले.भाजपाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता असल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘शेवटी ते ठरवतील तो वाल्या आणि ते ठरवतील तो वाल्मीकी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.थेट सरपंच निवडीस विरोधनगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला. मग उद्या मुख्यमंत्रीपण थेट जनतेतून निवडणार काय? कोणताही निर्णय घेताना आधीच्या निर्णयाचा आढावा घ्यायला हवा. सरपंच वा नगराध्यक्ष वेगळ्या विचारांचा निवडून आला की त्या ठिकाणी मतभेद होतात. त्याचा दुष्परिणाम शेवटी त्या-त्या पक्षाला भोगावे लागतात. तेव्हा सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.