शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा कडक करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 02:27 IST

लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक

ठाणे : लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक मुलींची, महिलांची फसवणूक केली जाते. याविरोधात केंद्र व राज्य सरकारने कडक कायदा करण्याची गरज आहे, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. २९ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनात गडकरी रंगायतन येथे ‘भारतातल्या समाज सुधारणा : विविध प्रयत्न’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात त्या बोलत होत्या. सावरकरांचे कृतीशील विचार अंगीकारण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकारांनी स्पर्श बंदी, व्यवसाय बंदी, वेदोक्त बंदी, सिंधु बंदी, शुद्धी बंदी, रोटी - बेटी बंदी यासारख्या सात बंदीचा उल्लेख केला आहे. त्या सात बंदी आजही समाजात मुळ धरून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सावरकरांचे विचार स्वीकारणे सोपे नाही. त्यांनी हिंदु धर्मातील सुधारणेसाठी एक प्रकारे आव्हान दिले होते आणि या आव्हानासाठी त्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. स्त्री विषयक ज्या ज्या सुधारणा भारतात झाल्या त्या सहजा सहजी स्वीकारल्या गेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्वे, फुले, सावरकरांनी धर्माची चौकट बदलण्याचा प्रयत्न केला. फसवणूक करुन केलेल्या धर्मांतराविरुद्ध कायदा केला पाहिजे अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. आत्महत्त्या करण्यापेक्षा सावरकरांना अपेक्षित सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबावा. श्रद्धा असावी यात दुमत नाही. परंतु अंधश्रद्धेमुळे होणारे स्त्रियांचे शोषण रोखण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज आहे. समाजातील अनिष्ट रुढी रोखण्यासाठी सरकारने वाट बघायला लावू नये. हिंदू धर्म सुधारावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासारखे धर्मांतर पुन्हा घडू नये यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सहा ते सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. तिला न्याय मिळविण्यासाठी किती वाट बघायची, असा प्रश्न देखील उपस्थित केला. रोटी बेटी बंदी प्रमाणे काही बंदी या समाजात शिल्लक आहेत. स्वेच्छा विवाहबंदी आजही समाजात आहे असे सांगत आर्थिक- समता बंदी, जातीय समानता बंदी, स्त्री पुरूष समानता बंदी, मानव अधिकार बंदी यांचा पगडा आजही समाजावर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. परिसंवादात सहभागी झालेले वक्ते अ‍ॅड. किशोर जावळे यांनी सावरकर ही फुंकून फुंकून पिण्यासारखी गोष्ट नाही असे सांगितले. आम्हाला सावरकर सिलेक्टेड हवे असतात. जिथे सावरकरांच्या समाजसुधारणेचा, विज्ञाननिष्ठेचा विचार येतो तेव्हा आम्ही त्यांच्यापासून दूर जातो. त्यांना एकटे पाडल्याची किंमत आज समाज मोजत आहे. सध्याच्या स्थितीत हिंदुत्वाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावरकरांना डावलून पुढे जाता येणार नाही. आज आणि उद्या त्यांचे विचार सर्वांना स्वीकारावेच लागतील, असे सांगत सावकरांचे विचार वाचा आणि त्यातून तुमच्यात बदल घडवा. तेव्हा समाज सुधारेल, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांनी समाज सुधारणेसाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील, यावर भर दिला. समाजातील विषमता, उच्च-नीचता संपविण्यासाठी सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)