शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कायदा, सुव्यवस्थेवर भर

By admin | Updated: August 1, 2016 04:39 IST

राज्यात कायदा व सुुव्यवस्था कायम राखण्यावर भर राहील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जातील

मुंबई : राज्यात कायदा व सुुव्यवस्था कायम राखण्यावर भर राहील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जातील, अशी ग्वाही नूतन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी रविवारी दिली. पोलीस मुख्यालयात दुपारी मावळते डीजीपी प्रवीण दीक्षित यांच्याकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे ४०वे पोलीसप्रमुख बनलेले माथुर हे १९८१च्या आयपीएस बॅचचे ‘टॉपर’ आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीची घोेषणा केली. सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना २२ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. रविवारी दुपारी मुख्यालयात पदभार स्वीकाण्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी देणे यावर आपला विशेष भर असेल. तूर्तास त्याबाबत आपण अधिक भाष्य करू इच्छित नाही. गेल्या साडेतीन दशकांपासून पोलीस दलात कार्यरत असलेले माथुर यांची मितभाषी व शिस्तप्रिय म्हणून ख्याती आहे. पदोन्नतीवर विधि व तंत्रज्ञ (एल अ‍ॅण्ड टी) विभागाचे पहिले महासंचालक बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर पोलीस गृहनिर्माण व कल्याणनिधी विभाग तर गेल्या २५ एप्रिलपासून ते एसीबीचे प्रमुख होते. पदभार ग्रहण समारंभाला पोलीस मुख्यालयात अपर महासंचालक राजेंद्र सिंह, बिपीन बिहारी, लक्ष्मीनारायण, प्रज्ञा सरवदे, विशेष महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंघल, कैसर खालीद, अर्चना त्यागी, राजकुमार व्हटकर, अधीक्षक प्रकाश वाडकर आदी उपस्थित होते. मावळते पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सलामी देऊन निरोप देण्यात आला. (प्रतिनिधी)>बॉम्बस्फोट तपासात महत्त्वाची भूमिकाउपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी १९९३च्या बॉम्बस्फोट तपासात विशेष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. वाहतूक शाखेत सहआयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.याव्यतिरिक्त प्रतिनियुक्तीवर सीबीआय, अपर महासंचालक (अस्थापना) त्याचप्रमाणे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे.