शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

By admin | Updated: March 11, 2016 04:17 IST

राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच

नाशिक : राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच वर्षे दुसऱ्या पक्षात जाता येऊ नये आणि निवडणूकही लढवता येऊ नये, असा कायदा करायला हवा, असे परखड मत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गोदावरी गौरव’चे वितरण गुरुवारी सायंकाळी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, नृत्यांगना कनक रेळे, मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, अमेरिकेत खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन, तर अहमदाबाद येथील वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘गोदावरी गौरव’ स्वीकारल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करीत नाना पाटेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर आता तरी शेतकऱ्याच्या गळ्यातील गळफास ढिला होईल, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. पण एकटा माणूस काही करू शकत नाही, मागची पिलावळही महत्त्वाची असते.सुलभा देशपांडे, विजया मेहता यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आलो. पुढे बाबा आमटे या महामानवाशी संबंध आला. समाजासाठी काही करायचे त्यांनी पेरून ठेवले होते, ते आता ‘नाम’च्या रूपाने उगवले. शेतकरी केवळ कर्जामुळे नव्हे, तर इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करतात. औषधे परवडत नाहीत म्हणून अनेकांनी गळफास घेतल्याचे सांगत पाटेकर यांनी ‘नाम’च्या कार्याविषयी माहिती दिली. पुरस्कारांमुळे आपण कोणी तरी आहोत, असे वाटू लागल्यावर मी हेमलकशाला जातो. तेथे गेल्यावर आपण कोणीच नाही, याची जाणीव होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)