शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

By admin | Updated: March 11, 2016 04:17 IST

राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच

नाशिक : राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच वर्षे दुसऱ्या पक्षात जाता येऊ नये आणि निवडणूकही लढवता येऊ नये, असा कायदा करायला हवा, असे परखड मत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गोदावरी गौरव’चे वितरण गुरुवारी सायंकाळी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, नृत्यांगना कनक रेळे, मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, अमेरिकेत खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन, तर अहमदाबाद येथील वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘गोदावरी गौरव’ स्वीकारल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करीत नाना पाटेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर आता तरी शेतकऱ्याच्या गळ्यातील गळफास ढिला होईल, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. पण एकटा माणूस काही करू शकत नाही, मागची पिलावळही महत्त्वाची असते.सुलभा देशपांडे, विजया मेहता यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आलो. पुढे बाबा आमटे या महामानवाशी संबंध आला. समाजासाठी काही करायचे त्यांनी पेरून ठेवले होते, ते आता ‘नाम’च्या रूपाने उगवले. शेतकरी केवळ कर्जामुळे नव्हे, तर इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करतात. औषधे परवडत नाहीत म्हणून अनेकांनी गळफास घेतल्याचे सांगत पाटेकर यांनी ‘नाम’च्या कार्याविषयी माहिती दिली. पुरस्कारांमुळे आपण कोणी तरी आहोत, असे वाटू लागल्यावर मी हेमलकशाला जातो. तेथे गेल्यावर आपण कोणीच नाही, याची जाणीव होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)