शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘सावकारांसाठीच कायद्यात बदल!’

By admin | Updated: January 8, 2016 03:44 IST

लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळू शकत नाही. परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे सरकारने अध्यादेशाच्या

मुंबई : लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळू शकत नाही. परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे सरकारने अध्यादेशाच्या आडून आपल्या मर्जीतील सावकारांना सहकारात घुसविण्याचा डाव रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.‘५ जानेवारीला राज्य सरकारने सहकारी बँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या अध्यादेशात जिथे सरकारी भागभांडवल आहे, तिथे सरकारच्या वतीने दोन अशासकीय सदस्य नेमण्याचे नमूद केले होते. त्यानंतर ८ तारखेला नवीन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सहकार क्षेत्रात भाजपा-सेनेला स्थान नाही. या दोन अध्यादेशांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र मोडीत काढणे किंवा या माध्यमातून आपली माणसे सहकार क्षेत्रात घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला. १२ जानेवारी २०१२ रोजी या देशात सहकार संस्था संदर्भातील घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राला अधिक लोकतांत्रिक स्वरूप दिले पाहिजे, असा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. लोकतांत्रिक पद्धतीने निवडून न येणाऱ्या लोकांना सहकारात घुसविण्याचा निर्णय कुठेतरी लोकतांत्रिक व्यवस्थेला मारक असल्याचे ते म्हणाले.