शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘सावकारांसाठीच कायद्यात बदल!’

By admin | Updated: January 8, 2016 03:44 IST

लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळू शकत नाही. परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे सरकारने अध्यादेशाच्या

मुंबई : लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळू शकत नाही. परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे सरकारने अध्यादेशाच्या आडून आपल्या मर्जीतील सावकारांना सहकारात घुसविण्याचा डाव रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.‘५ जानेवारीला राज्य सरकारने सहकारी बँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या अध्यादेशात जिथे सरकारी भागभांडवल आहे, तिथे सरकारच्या वतीने दोन अशासकीय सदस्य नेमण्याचे नमूद केले होते. त्यानंतर ८ तारखेला नवीन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सहकार क्षेत्रात भाजपा-सेनेला स्थान नाही. या दोन अध्यादेशांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र मोडीत काढणे किंवा या माध्यमातून आपली माणसे सहकार क्षेत्रात घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला. १२ जानेवारी २०१२ रोजी या देशात सहकार संस्था संदर्भातील घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राला अधिक लोकतांत्रिक स्वरूप दिले पाहिजे, असा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. लोकतांत्रिक पद्धतीने निवडून न येणाऱ्या लोकांना सहकारात घुसविण्याचा निर्णय कुठेतरी लोकतांत्रिक व्यवस्थेला मारक असल्याचे ते म्हणाले.