शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेगाव येथे ‘श्रीं’च्या पुण्यतिथी सोहळय़ास प्रारंभ

By admin | Updated: September 3, 2016 01:56 IST

मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी.

शेगाव, दि. २ : श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला शुक्रवारपासून श्री गणेश व वरुणयागाने प्रारंभ करण्यात आला. विश्‍वस्त त्रिकाळ यांच्या हस्ते पुजा करून यागास सकाळी १0 वा. प्रारंभ झाला. मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी असून कार्यक्रमाची सांगता ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त २ ते ७ सप्टेंबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम असून या उत्सव सोहळय़ात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, रात्री ८ ते १0 किर्तन असे कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी शुक्रवारी ८ दिंड्यांचे आगमन झाले आहे तर उत्सवाच्या मुख्य दिवसापर्यंंत ७00 च्या वर भजनी दिंड्यांचे आगमन होईल. या सोहळय़ात हभप प्रमोदबुवा पानबुडे (श्री क्षेत्र आळंदी), रमेशबुवा आवारे (खापरवाडी), उमेशबुवा दशरथे (श्री क्षेत्र आळंदी), विष्णुबुवा कव्हळेकर (कव्हळा) यांचे किर्तन व प्रवचन होणार आहे. श्रींचा मुख्य पुण्यतिथी सोहळा मंगळवारी होणार आहे. मंगळवारी सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वाजता श्रींची भव्य पालखीची गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. बुधवारी सकाळी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर दहीहंडी, गोपालकाला होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपुर्ण मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुध्दा करण्यात आली आहे. संस्थानच्या परिसरामध्ये भक्तांच्या सेवेसाठी हजारो सेवेकरी आपली सेवा देणार आहेत. उत्सव काळात शहरातील व मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यतिथी उत्सवदिनी ३ पोलीस निरीक्षक , ११ अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक, १0५ पोलीस कर्मचारी, २५ साध्या वेशातील पोलिस, २0 महिला पोलीस, २0 वाहतूक पोलीस व सीआरपीएफचे एक पथक तैनात करण्यात येणार आहे.