शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

सुविधादालन उपक्रम सुरू

By admin | Updated: May 18, 2016 01:31 IST

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे.

बारामती : नागरिक आणि प्रशासनाच्या समन्वयासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे. त्यातून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेण्याचा उद्देश आहे, असे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले.बारामती येथे ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. जगताप म्हणाले, सुमारे ५५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या शहराचे तीनशे ते सव्वातीनशे कोटींचे बजेट आहे. यातून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. वाढीव हद्दीतील रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाणीपुरवठ्याच्या सक्षम नियोजनामुळे२ लाख लिटर दैनंदिन पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. ८५ टक्के भूमिगत गटारांचे काम पूर्ण केले आहे. मागेल त्याला ‘ड्रेनेज’ देणार आहे. दलितवस्तीसाठी अधिकचा निधी उपलब्ध केला जाईल. बारामती शहरातील खराब पाणी झाडांना देऊन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना देण्यात येईल. शहरात तालुकास्तरावर प्रथमच ‘ओपन जिम’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्लॅस्टिक न वापरण्याची नागरिकांनी प्रतिज्ञा करावी. ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले म्हणाले, सकारात्मक समन्वयासाठी ‘लोकमत’चा विविध उपक्रमांतून नेहमीच पुढाकार असतो. शहरात नगरपालिका प्रशासनाने समतोल विकास साधला आहे. पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा शहरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ‘लोकमत’मुळे रेशनिंग दुकानातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याचे सतीश गावडे यांनी नमूद केले. बोगस कागदपत्रे उघडकीस आली; त्यामुळे संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले. >गळती थांबवावी : प्रशासनाला आवाहन माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी म्हणाले, गेली ६ वर्षे जुन्या साठवण तलावातून कोट्यवधी लिटर पाण्याची गळती झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून गळती थांबविणे गरजेचे आहे. राज्यात तीव्र दुष्काळ असताना पाण्याची गळती होणे योग्य नाही. नवीन तंत्रज्ञानाने कोयनेतील गळती थांबविण्यास यश आले; त्यामुळे या तलावातील गळती थांबविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. गळतीमुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले. त्यासाठी संबंधित ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने कोणती कारवाई केली? शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी रस्ते होणे आवश्यक आहे. निर्जन ठिकाणी रस्ते झालेले नाहीत. हरिकृपानगर परिसरातील रस्त्यांना न्याय देण्याची मागणी आहे. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी, हरिकृपानगरच्या रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी (दि. १७) ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत संजय संघवी यांच्या तोंडी प्रसिद्ध झालेले वक्तव्य वस्तुत: माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांचे होते.