शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

लातूरच्या पाण्यावरून खडाजंगी

By admin | Updated: April 8, 2016 03:32 IST

लातूर शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही

मुंबई : लातूर शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेस नेत्यांना करताच प्रचंड गदारोळ झाला. शेवटी, खडसे यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मागे घेत लातूरला १५ दिवसांत रेल्वेने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितल्याने विरोधक शांत झाले.काँग्रेसचे अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक स्थलांतर करीत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पाण्याअभावी स्थलांतर झालेले नाही, असा दावा खडसे यांनी केला. त्याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी तीव्र आक्षेप घेतला. ज्या नेतृत्वाबाबत खडसे आरोप करीत आहेत त्यांनीच मांजरा बॅरेज बांधले, लातूर शहराचा विकास केला. तसा विकास खडसेंनी जळगावचा करून दाखवावा, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला; तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लातूरमध्ये काँग्रेसच्या हातातील पालिका पाणी विकत असल्याचा आरोप केला.>लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही, असे विचारत मांजरा सहकारी साखर कारखान्यासाठी पाणी नेल्याने आज भीषण टंचाईची परिस्थिती असल्याचे खडसे यांनी सांगताच विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच संतप्त झाले. वेलमध्ये उतरून त्यांनी एकच गदारोळ केला. त्याचवेळी भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी ४० वर्षांत काँग्रेसने काय केले, असा सवाल केला, तेव्हा त्यांची काँग्रेसचे अमिन पटेल आदींशी खडाजंगी झाली. > पहिल्या सामन्याचा मार्ग मोकळाराज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. - वृत्त/२> औरंगाबादचे बीअरचे कारखाने बंद करा - सत्तारऔरंगाबादमधील बीअर कारखान्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने किमान आगामी तीन महिन्यांसाठी हे कारखाने बंद ठेवण्याची मागणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत शून्य तासात केली. जवळपास ३२ एमएलडी पाणी हे कारखाने वापर असल्याचे सत्तार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सांगितले.> गांभीर्याने वागा - सुप्रीम कोर्ट : दुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल) सर्वोच्च न्यायालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. यामुळे न्यायाधीशांनी त्यांना रागातच विचारले की, ‘आम्ही रिकामटेकडे आहोत का? कमीतकमी याबाबतीत तरी काही गंभीरता दाखवा.’ - वृत्त/९> रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन मालगाड्या पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या आहेत. गरजेनुसार आणखी गाड्या मिळतील. बाजूच्या तेलंगणामधून पाणी देण्याची आमची तयारी असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी मला सांगितले आहे.- एकनाथ खडसे> आघाडी सरकारच्या काळात केवळ वर्षभरात १२० किमीची पाइपलाइन टाकून उस्मानाबाद शहराला पाणी पुरवून समस्या कायमची सोडविली. आपल्या सरकारने लातूरसाठी असे पाणी उजनी धरणातून का आणले नाही. - पृथ्वीराज चव्हाण