शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लातूरमध्ये जलसंकट !

By admin | Updated: February 22, 2016 04:17 IST

साडेपाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्रोत आटल्यामुळे लातूर शहरात पाण्यावरून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून, अख्खं शहर उठण्याची भीती निर्माण झाली आहे.

- दत्ता थोरे,  लातूर साडेपाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्रोत आटल्यामुळे लातूर शहरात पाण्यावरून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून, अख्खं शहर उठण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्यावाचून उद्योगधंदे बंद पडल्याने आतापर्यंत सुमारे ५० हजार मजुरांनी स्थलांतर केले आहे, तर विद्यार्थी वसतिगृहे, दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर बंद ठेवण्याची पाळी आली आहे. सरकारने वेळीच उपाययोजना हाती घेतली नाही, तर मोठा जनउद्रेक होऊ शकतो. लातुरात ही स्थिती असतानाच पाणीटंचाईने दोन शालेय विद्यार्थ्यांचा बळी घेतल्याची घटना अहमदपूर तालुक्यात रविवारी घडली. लातूर शहराला मांजरा नदीवरील नागझरी येथील साई बंधारे व बीडमध्ये मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. साई बंधाऱ्याची १.४७ दलघमी तर मांजरा धरणाची ४४५ दलघमी क्षमता. साई अपुरे पडत असल्याने १२ वर्षांपूर्वी कायमस्वरूपी योजना म्हणून मांजरा धरणावरून ११२.६६ कोटी खर्चून योजना पूर्णत्वास नेली. परंतु लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला नाही. यंदा फेब्रुवारीतच दोन्ही जलस्रोत कोरडे पडल्याने १५ दिवसांतून एकवेळ येणारे पाणीही बंद झाले. ‘आजपासून नळाला पाणी येणार नाही,’ अशी ‘अभूतपूर्व’ घोषणाच करण्याची पाळी पालिकेवर आली. साई बंधाऱ्यात खोदलेल्या चरांमधून पाच दिवसातून प्रतिकुटूंब २०० लिटर पाणी ७० टँकरद्वारे पुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने आखले, पण अवघ्या आठ दिवसात या नियोजन कोलमडून पडले. बलवान नगरसेवकांनी जलकुंभावर कब्जा करून खासगी टँकरच्या माध्यमातून ‘खरी कमाई’ सुरू केली आहे.गेल्या चार-पाच वर्षापासून टंचाईची स्थिती असल्याने शहरात तब्बल २० हजार बोअर पाडून जमिनीची चाळण करून टाकली गेली. आजमितीला त्यापैकी केवळ हजारभर बोअर चालू आहेत. त्यावर १२०० हून अधिक टँकर्स सुरू असून एका टँकरचा भाव दीड हजाराच्या पुढे गेला आहे. बाटल्या, जार आणि टँकरची ही उलाढाल दररोज ४० लाखाच्या घरात आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मे मध्ये काय होईल? काही दानशूर वाढदिवसाला फळे वाटावीत तसे पाणी वाटपाचे कार्यक्रम करून तेवढेच ‘पुण्य’ पदरात पाडून घेत आहेत.लातूर एमआयडीसीतील दोन हजार उद्योगांपैकी ५०० हून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना आपल्या धंद्याला कुलूप लागले लागले आहे. एमआयडीसीला महिन्यातून एकदा अर्धा तास सुटणारे पिण्याचे पाणीही बंद झाले आहे. लातुरात डाळ मिल, तेल मिल मोठ्या संख्येने आहेत. ते सर्व उद्योग बंद पडल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.लातूर शहरात गेल्या वर्षभरापासून बांधकाम परवाने देणे बंद झाले आहे. परिणामी, बांधकामासह त्यावर अवलंबून असलेल्या पाच हजार उद्योगधंदे आणि ४० हजार बांधकाम मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समिती, व्यापार पेठ, औद्योगिक वसाहत ओस पडल्याने सुमारे पन्नाह हजार मजुरांनी दुसऱ्या शहराकडे स्थलांतर केले आहे. उजनी योजना मंजूर करावी : महापौर लातूरच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे आम्हाला उजनीहून पाणी द्यावे,असे महापौर अख्तर शेख यांचे म्हणणे आहे.नियोजन चालू आहे सर्व जलस्रोत आटल्याने माकणी धरणाहून पाणी टँकरने आणायचे नियोजन आहे. शिवाय, मिळेल तिथून टँकरद्वारे पाणी आणावे लागेल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.सरकारने लातूरकरांना फसविले ! लातूरच्या पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही. आॅगस्टमध्ये दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीहून रेल्वेने पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने ना रेल्वेमंत्र्यांकडे हक्क मागितला ना पाणीपुरवठा मंत्र्यांकडे. शेवटी मुख्यमंत्री दौऱ्यात उस्मानाबादच्या उजनीहून आलेल्या पाइपलाइनने ८ एमएलडी पाणी उपसून लातूरला देण्याचे ठरले. तेही हवेत विरले.माकणीहून साडेतीन एमएलडी पाणी लातूरला आणण्यासाठी नवा प्रस्ताव गेला, पण त्यालाही मंजुरी मिळाली नाही. आता पालकमंत्री म्हणतात, आहे ते पाणी जपून वापरा. जपायला पाणी आहेच कुठे, असा लातूरकरांचा सवाल आहे. वसतिगृहे उठली; शस्त्रक्रियाही बंद! : शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या पॅटर्नमुळे शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे थाटली गेली आहेत. परंतु पाण्याअभावी सरकारी आणि खासगी वसतिगृहे बंद करण्यात आली आहेत. शाळा-महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना विकत पाणी घ्यावे लागते. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे. पाण्याअभावी खासगी आणि शासकीय दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर बंद ठेवावे लागत आहे. मांजरा धरण ३५ वर्षांत १३ वेळाच भरले!बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ३५ वर्षांच्या काळात १३ वेळाच १०० टक्के भरले. अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये असल्याने त्याची भरण्याची शक्यताच कमी आहे. यंदा फेब्रुवारीतच आटलेल्या धरणाने लातूरकरांच्याच नव्हे, तर यावर विसंबून असलेल्या कळंब, शिराढोण, मुरूड, केज, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसी अशा पाच शहरांसह ४२ गावांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.