शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

By admin | Updated: April 20, 2016 05:48 IST

पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते.

लातूर : पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र त्यातील निम्मे म्हणजे केवळ २५ लाख लीटर पाणी वाटप होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाणी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरासाठी रेल्वेने मिरजहून दररोज साधारण ५ लाख लीटर पाणी येते. शिवाय निम्न तेरणा प्रकल्पातून १२ लाख, डोंगरगाव बॅरेजेसमधून ३० लाख आणि साई ट्रेंचमधून ३ लाख लीटर असे रोज ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ प्रतिकुटुंब २०० लीटर याप्रमाणे लातूरकरांना दररोज २५ लाख लीटर पाणी पुरविले जाते. महापालिकेच्या दप्तरात ९० हजार घरांची नोंद आहे. भाडेकरूंसह एकूण कुटुंब संख्या १ लाख २० हजार आहे़ त्यांना आठ दिवसांना २०० लीटरप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे पालिकेचे म्हणणे ग्राह्य धरल्यास दररोज २५ लाख लीटर पाण्याचे वितरण होते़ शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकर आहेत़ स्थानिक स्रोतातून तसेच रेल्वेचे पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लीटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लीटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आठ दिवसांना २०० लीटर पाणी पुरत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ शिवाय पाणी वितरणामध्ये दुजाभाव होत असल्याचाही आरोप होत असून, आठ दिवसांऐवजी पाच दिवसांनी पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)>पालिकेकडे पाणीवाटपाची प्रभागनिहाय नोंद आहे. तेथील चार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लीटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. - सुधाकर तेलंग, आयुक्तशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ ते ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ तेवढेच पाणी नागरिकांना वितरित केले जाते़ ७० टँकरद्वारे ६ हजार लीटर क्षमतेच्या एका टँकरच्या सहापेक्षा अधिक फेऱ्या होतात़ शिवाय टँकर भरणा केंद्रातूनही नागरिक पाणी घेऊन जातात़ दिवसाला वितरण केवळ २५ लाख लीटर नसून ४५ ते ५० लाख लीटर होते.- कमलाकर फड, उपजिल्हाधिकारी