शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

By admin | Updated: April 12, 2016 07:53 IST

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या

- दत्ता थोरे,  लातूर

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी थांबली होती. लातूरच्या रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी थांबलेली गर्दी रेल्वे येणार नसल्याची कुणकूण लागल्यावर निघून गेली. स्वागताविना पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी औसा स्थानकावर उभी होती. 

पाणी एक्सप्रेसला दहा वॅगन जोडलेले असून, प्रत्येक वॅगमध्ये ५० हजार लिटर पाणी आहे. मिरज रेल्वे स्थानकात हे पाणी भरण्यात आले होते. पाणी एक्सप्रेसची ही पहिली फेरी एकप्रकारची चाचपणी असून, त्यानंतर आणखी काही फे-या होणार आहेत. 
पाणी एक्सप्रेस जिथे थांबली आहे तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
 
ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी  पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली आहे. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. 

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर ही जलपरी मुरुड-अकोला (ता. लातूर) नजिक औसा रोड स्टेशनवर आली आणि लातूरसह महाराष्ट्राच्या इतिहासात अनोखी नोंद झाली. लातूरपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरुड-अकोला नजिक औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत ही जलपरी थांबली होती.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘१५ दिवसात लातूरला रेल्वेने पाणी देणार’ ची घोषणा केली. मागच्या वर्षी आॅगस्टमध्येही अशीच घोषणा झाली खरी. पण पाणी आले नव्हते. यंदा घोषणेनंतर सातव्या दिवशीच पाणी आल्याने लातूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पाच लाख लिटर पाण्याचे दहा रॅक घेऊन निघालेली जलपरी मजल-दरमजल करीत लातूर जिल्ह्यात आली. सुव्यवस्थेसाठी बदलली वेळ..!पाईपलाईनचे काम ताजे आहे. पाणी पडल्यानंतर ते खराब होऊ शकते. कामावर अंतिम हात मारण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. शिवाय, मध्यरात्रीच्या वेळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर ही जलपरी आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदात बाधा येऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी रेल्वेचे जंगी स्वागत करावे, यासाठी रेल्वेच्या आगमनाची वेळ बदलण्यात आली. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात आगमन झालेल्या जलपरीला औसा रोड स्थानकावर थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.