शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

By admin | Updated: April 12, 2016 07:53 IST

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या

- दत्ता थोरे,  लातूर

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी थांबली होती. लातूरच्या रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी थांबलेली गर्दी रेल्वे येणार नसल्याची कुणकूण लागल्यावर निघून गेली. स्वागताविना पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी औसा स्थानकावर उभी होती. 

पाणी एक्सप्रेसला दहा वॅगन जोडलेले असून, प्रत्येक वॅगमध्ये ५० हजार लिटर पाणी आहे. मिरज रेल्वे स्थानकात हे पाणी भरण्यात आले होते. पाणी एक्सप्रेसची ही पहिली फेरी एकप्रकारची चाचपणी असून, त्यानंतर आणखी काही फे-या होणार आहेत. 
पाणी एक्सप्रेस जिथे थांबली आहे तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
 
ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी  पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली आहे. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. 

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर ही जलपरी मुरुड-अकोला (ता. लातूर) नजिक औसा रोड स्टेशनवर आली आणि लातूरसह महाराष्ट्राच्या इतिहासात अनोखी नोंद झाली. लातूरपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरुड-अकोला नजिक औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत ही जलपरी थांबली होती.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘१५ दिवसात लातूरला रेल्वेने पाणी देणार’ ची घोषणा केली. मागच्या वर्षी आॅगस्टमध्येही अशीच घोषणा झाली खरी. पण पाणी आले नव्हते. यंदा घोषणेनंतर सातव्या दिवशीच पाणी आल्याने लातूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पाच लाख लिटर पाण्याचे दहा रॅक घेऊन निघालेली जलपरी मजल-दरमजल करीत लातूर जिल्ह्यात आली. सुव्यवस्थेसाठी बदलली वेळ..!पाईपलाईनचे काम ताजे आहे. पाणी पडल्यानंतर ते खराब होऊ शकते. कामावर अंतिम हात मारण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. शिवाय, मध्यरात्रीच्या वेळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर ही जलपरी आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदात बाधा येऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी रेल्वेचे जंगी स्वागत करावे, यासाठी रेल्वेच्या आगमनाची वेळ बदलण्यात आली. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात आगमन झालेल्या जलपरीला औसा रोड स्थानकावर थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.