शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

By admin | Updated: April 12, 2016 07:53 IST

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या

- दत्ता थोरे,  लातूर

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी थांबली होती. लातूरच्या रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी थांबलेली गर्दी रेल्वे येणार नसल्याची कुणकूण लागल्यावर निघून गेली. स्वागताविना पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी औसा स्थानकावर उभी होती. 

पाणी एक्सप्रेसला दहा वॅगन जोडलेले असून, प्रत्येक वॅगमध्ये ५० हजार लिटर पाणी आहे. मिरज रेल्वे स्थानकात हे पाणी भरण्यात आले होते. पाणी एक्सप्रेसची ही पहिली फेरी एकप्रकारची चाचपणी असून, त्यानंतर आणखी काही फे-या होणार आहेत. 
पाणी एक्सप्रेस जिथे थांबली आहे तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
 
ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी  पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली आहे. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. 

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर ही जलपरी मुरुड-अकोला (ता. लातूर) नजिक औसा रोड स्टेशनवर आली आणि लातूरसह महाराष्ट्राच्या इतिहासात अनोखी नोंद झाली. लातूरपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरुड-अकोला नजिक औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत ही जलपरी थांबली होती.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘१५ दिवसात लातूरला रेल्वेने पाणी देणार’ ची घोषणा केली. मागच्या वर्षी आॅगस्टमध्येही अशीच घोषणा झाली खरी. पण पाणी आले नव्हते. यंदा घोषणेनंतर सातव्या दिवशीच पाणी आल्याने लातूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पाच लाख लिटर पाण्याचे दहा रॅक घेऊन निघालेली जलपरी मजल-दरमजल करीत लातूर जिल्ह्यात आली. सुव्यवस्थेसाठी बदलली वेळ..!पाईपलाईनचे काम ताजे आहे. पाणी पडल्यानंतर ते खराब होऊ शकते. कामावर अंतिम हात मारण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. शिवाय, मध्यरात्रीच्या वेळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर ही जलपरी आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदात बाधा येऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी रेल्वेचे जंगी स्वागत करावे, यासाठी रेल्वेच्या आगमनाची वेळ बदलण्यात आली. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात आगमन झालेल्या जलपरीला औसा रोड स्थानकावर थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.