शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

पावसाळा लांबला तरच लातूरला रेल्वेने पाणी

By admin | Updated: March 29, 2016 21:06 IST

लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते.

उपलब्ध साठा जूनअखेर पुरवणार : वितरणाचे काटेकोर नियोजन

लातूर : लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ त्यावर मात करण्यासाठी १ हजारपेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे़ मांजरा, साई, नागझरी प्रकल्पामध्ये चर खोदण्यात येत असून त्याद्वारेही पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन केल्याने पाऊस वेळेवर पडल्यास संकट टळेल आणि रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असेही पोले यांनी सांगितले.रेल्वे वाहतुकीसाठी १८ तासांचा कालावधी लातूर-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूरहून किमान ३० ते ३५ हजार लिटर क्षमतेचे १५ ते २० टँकर (वाघिणी) जोडून ते पाणी लातूरला आणण्याचा हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे़ एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर्स पाणी आणण्याचा हा प्रस्ताव असून, या प्रक्रियेला किमान १८ तासांचा कालावधी लागेल़ या कालावधीत रेल्वे ट्रॅक कुठला रिकामा राहू शकतो किंवा कोणता ट्रॅक सोयीचा आहे, याबाबतचा विचार शासन पातळीवर सुरु आहे़- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी-लातूर