शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

स्वच्छतेसाठी लातूर जि. प. च्या सीईओंचा १६ किमी सायकल प्रवास

By admin | Updated: October 16, 2016 19:22 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी रविवारी सकाळी सायकलवर प्रवास केला़ राजीव गांधी चौकातून पाखरसांगवी गावापर्यंतचा ८ किमी प्रवास सायकलवर

ऑनलाइऩ लोकमत
लातूर, दि. 16 - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी रविवारी सकाळी सायकलवर प्रवास केला़ राजीव गांधी चौकातून पाखरसांगवी गावापर्यंतचा ८ किमी प्रवास सायकलवर करण्यात आला़ सकाळी ६ वाजता ते लातुरातून निघाले आणि पाखरसांगवीत ६़३० वाजता पोहोचले़ त्यांनी गावातील स्वच्छतेची पाहणी करून ग्रामस्थांना हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आवाहन केले़ जाण्या-येण्याचे १६ कि़मी़ अंतर सायकलवर पार करून स्वच्छता अभियानाबरोबर सदृढ आरोग्य ठेवण्याचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे़ 
मिशन स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ माणिक गुरसळ यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया रविवारी लातूर लगतच्या गावांना सायकलवर भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार रविवारी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली़ सकाळी ६ वाजता राजीव गांधी चौकात सीईओ गुरसळ यांच्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब शेलार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही़एस़ चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ संतोष नवले, गटविकास अधिकारी धस, संवाद तज्ञ उद्धव फड एकत्र आले आणि थेट पाखरसांगवी सायकलवर गाठली़ ८ कि़मी़ अंतर सायकलवर न थकता या अधिकाºयांनी पार केले़ तेथे गेल्यानंतर सरपंच महानंदा बोयणे, उपसरपंच साहेबराव देशमुख व गावकºयांची भेट घेतली़ पाखरसांगवीत बहुतांश ग्रामस्थांकडे शौचालय आहेत़ परंतु, त्याचा वापर केला जात नाही़ उघड्यावर शौचालयाला जात असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे सीईओंनी सरपंचा समवेत गावकºयांची छोटेखानी बैठक घेतली़ यावेळी त्यांनी शौचालयाचा वापर करून गाव हागणदारीमुक्त करण्याची सूचना केली़ सरपंच महानंदा बोयणे यांनी सीईओंच्या या सूचनेला होकार देत गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला़.
 
१८ वर्षानंतर चालविली सायकल़़-
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे म्हणाले, आता सायकलवर फिरण्याचा योग्य येईल, असे वाटले नव्हते़ कॉलेजला असतानाच सायकलवर फिरत होतो़ १८ वर्षानंतर पहिल्यांदाच १६ कि़मी़चे अंतर सायकलवर फिरलो़ सायकलींग करणे व्यायामाचाच प्रकार आहे़ स्वच्छता अभियानाबरोबर आमचाही व्यायाम या उपक्रमामुळे होणार आहे़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचनेनुसार आता महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया रविवारी आमची सायकल फेरी राहणार आहे़